नवी दिल्ली : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या (एआय) या युगात भारतीय डेव्हलपर्स हे जगाचे ‘अदृश्य शिल्पकार’ असून, भारत या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा देश बनला आहे, असे गौरवौद्गार ‘ओपन यूके’च्या मुख्य सीईओ अमांडा ब्रॉक यांनी काढले.
अमांडा ब्रॉक यांनी एका मुलाखतीत तंत्रज्ञानाची तुलना पिझ्झासोबत केली. त्या म्हणाल्या, जेव्हा पिझ्झा खातो, तेव्हा त्यावरील टॉपिंग्सबद्दल बोलतो; पण खरी चव आणि आधार हा ‘बेस’ असतो. तो बेसच नसेल, तर पिझ्झाला अर्थ नाही. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे तंत्रज्ञानाचा असाच ‘बेस’ तयार करतात. जगभरातील क्लाउड सेवा, मोबाइल ॲप्स व इंटरनेट सुरक्षा आज ज्या पायावर उभी आहे, तो पाया भारतीय तरुण बुद्धिमत्तेने मजबूत करत आहेत. पूर्वी आपण परदेशी सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरायचो; पण ब्रॉक यांच्या मते, आता चित्र बदलले आहे.
शेतकऱ्यांना ‘रिअल टाइम’ सल्ला हवा
शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे. संशोधक आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा दुवा सध्या तुटलेला असून, सरकारी यंत्रणांचे लक्ष केवळ बियाणे-खते वाटपावर आहे. शेतकऱ्यांना नेमक्या सल्ल्याची गरज असते. ही माहितीची दरी भरून काढण्यासाठी ‘एआय’ क्रांती करू शकते, असे ठाम मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केले.
एआय परिषदेत जगातील दिग्गज उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सहभागी होणार की नाही, याबाबत माेठा संभ्रम निर्माण झाला आहे.
‘डीपफेक’चा विळखा रोखण्यास येणार अधिक कडक कायदे
‘डीपफेक’ व्हिडीओ आणि फोटोची समस्या गंभीर होत असून, मुले आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी सध्याच्या नियमांपेक्षा अधिक कडक कायदे आणण्याची गरज आहे, असे स्पष्ट संकेत केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिले.
डीपफेकमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. संसदेतही या विषयावर सर्वांचे एकमत घडवून आणले जाईल, असे ते म्हणाले.
वैष्णव यांनी मागितली माफी
देशाची राजधानी दिल्लीत सध्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समीट’ या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान परिषदेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी झालेल्या अलोट गर्दीमुळे आणि नियोजनातील त्रुटींमुळे उपस्थितांना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळाची दखल घेत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी जाहीर माफी मागितली.
Web Summary : Indian developers are vital to global AI, says Open UK's CEO. Government focuses on AI in agriculture and stricter laws against deepfakes. Minister Vaishnav apologized for summit disorganization.
Web Summary : ओपन यूके के सीईओ का कहना है कि भारतीय डेवलपर्स वैश्विक एआई के लिए महत्वपूर्ण हैं। सरकार कृषि में एआई और डीपफेक के खिलाफ सख्त कानूनों पर ध्यान केंद्रित कर रही है। मंत्री वैष्णव ने शिखर सम्मेलन में अव्यवस्था के लिए माफी मांगी।