शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नव्या नोकरीच्या शोधात JOB सोडणाऱ्यांची संख्या वाढली; रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 20:36 IST

गेल्या काही वर्षांत भारतात कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे

 नवी दिल्ली - एकीकडे देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, तर दुसरीकडे देशात काम करणारे लोक नोकरी सोडून जाण्याचा विचार करत आहेत. देशातील ३० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची आहे. तर ७१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, कामाकडे कंपनीचं दुर्लक्ष होत असल्यानं करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी पुढे जायला हवं असा खुलासा रिपोर्टमधून झाला आहे.  

PWC इंडियाच्या एका अहवालात असं म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत भारतात कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. मालक आणि कर्मचारी या दोघांच्याही मानसिकतेत बदल झाला आहे. हा अहवाल PWC च्या 'ग्लोबल वर्कफोर्स होप्स अँड फियर्स सर्व्हे २०२२' च्या निष्कर्षांवर आधारित आहे. भारतातील २६०८ कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले होते आणि त्यापैकी ९३ टक्के पर्मनंट कर्मचारी आहेत.

नोकरी बदलण्याची शक्यता जास्तसर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते नोकरी बदलण्याची शक्यता जास्त आहे. तर जागतिक स्तरावर १९ टक्के कर्मचाऱ्यांनी हे मत व्यक्त केले. याशिवाय ३२ टक्के कर्मचारीही नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. तर १९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले कर्मचारी नवीन नोकरी शोधण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा ३७ टक्के लोकांनी पुढील एका वर्षात नोकऱ्या बदलण्याचे संकेत दिले आहेत. सर्वेक्षणानुसार, १९९० च्या दशकाच्या अखेरीस आणि २०१० च्या दशकाच्या सुरुवातीस जन्मलेल्या कर्मचार्‍यांची नोकरी सोडण्याची शक्यता कमी आहे.

जूनमध्ये बेरोजगारीचा दर ७.८० टक्के जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर ७.८० टक्क्यांवर पोहोचला होता. त्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात ७.३० टक्क्यांवरून जूनमध्ये ८.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात, परिस्थिती थोडी बरी होती आणि बेरोजगारीचा दर ७.३ टक्के नोंदवला गेला, जो मे मध्ये ७.१२ टक्के होता. आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा सर्वाधिक दर हरियाणात ३०.६ टक्के होता. त्यापाठोपाठ राजस्थान २९.८ टक्के, आसाम १७.२ टक्के, जम्मू आणि काश्मीर १७.२ टक्के आणि बिहार १४ टक्के आहे. 

टॅग्स :jobनोकरी