शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:26 IST

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे इंटरनेट डाटाच्या किमतीत घट झाली आहे. आज इतर देशांतील डाटाची किंमत भारताच्या तुलनेत दहापट जास्त आहे. जगाला जोडणे हेच भारताचे मिशन आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे भरलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसच्या उद्घाटनावेळी केले. यावेळी केंद्रीय दळवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील उपस्थित होते. या परिषदेला जगभरातील १२० देशांमधून अधिक प्रतिनिधी आणि सुमारे ९०० स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. 

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

२०० पेक्षा अधिक मोबाइल निर्मिती युनिट - यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने बसविलेल्या ऑप्टिकल फायबरची लांबी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतराच्या आठपट आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही ५जी लाँच केले. आज देशातील प्रत्येक जिल्हा ५जीने जोडला गेला आहे. आता आम्ही ६जीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. - मोबाइल भारतात तयार केल्याशिवाय स्वस्त होऊ शकत नाहीत. २०१४ मध्ये देशात फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट होते. आज भारतात २०० पेक्षा अधिक  निर्मिती युनिट आहेत. पूर्वी परदेशातून फोन आयात करीत होतो. आता देशात सहा पट अधिक फोन बनविले जात आहेत, असे ते म्हणाले. प्र- प्राचीन सिल्क रुटपासून आजच्या काळाताील तंत्रज्ञानाच्या मार्गापर्यंत भारत केवळ जोडण्याचे काम करीत आला आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

११६ कोटी मोबाइल कनेक्शन्स : सिंधिया ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, भारतातील मोबाइल कनेक्शन ९०.४ कोटींवरून वाढून ११६ कोटींच्या घरात पोहोचली आहेत. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचे ९२.४ कोटी यूजर्स आहेत. भारतातील ऑप्टिकल फायबल केबल १.१० कोटी किलोमीटरची होती, तीच आज ४.१० कोटी किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. 

भारतीय डाटा देशातच राहावा : आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेयरमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी म्हणाले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एआयचे योगदान मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे भारताने तातडीने एआयचा अवलंब करावा. डेटा सेंटर धोरणाचा २०२० मसुदा अद्ययावत करण्याची आम्ही सरकारला विनंती करतो. भारतीय डाटा देशातील डाटा सेंटरमध्येच राहिला पाहिजे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय