शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:26 IST

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे इंटरनेट डाटाच्या किमतीत घट झाली आहे. आज इतर देशांतील डाटाची किंमत भारताच्या तुलनेत दहापट जास्त आहे. जगाला जोडणे हेच भारताचे मिशन आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे भरलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसच्या उद्घाटनावेळी केले. यावेळी केंद्रीय दळवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील उपस्थित होते. या परिषदेला जगभरातील १२० देशांमधून अधिक प्रतिनिधी आणि सुमारे ९०० स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. 

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आदींची यावेळी भाषणे झाली.

२०० पेक्षा अधिक मोबाइल निर्मिती युनिट - यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने बसविलेल्या ऑप्टिकल फायबरची लांबी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतराच्या आठपट आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही ५जी लाँच केले. आज देशातील प्रत्येक जिल्हा ५जीने जोडला गेला आहे. आता आम्ही ६जीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहोत. - मोबाइल भारतात तयार केल्याशिवाय स्वस्त होऊ शकत नाहीत. २०१४ मध्ये देशात फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट होते. आज भारतात २०० पेक्षा अधिक  निर्मिती युनिट आहेत. पूर्वी परदेशातून फोन आयात करीत होतो. आता देशात सहा पट अधिक फोन बनविले जात आहेत, असे ते म्हणाले. प्र- प्राचीन सिल्क रुटपासून आजच्या काळाताील तंत्रज्ञानाच्या मार्गापर्यंत भारत केवळ जोडण्याचे काम करीत आला आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

११६ कोटी मोबाइल कनेक्शन्स : सिंधिया ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, भारतातील मोबाइल कनेक्शन ९०.४ कोटींवरून वाढून ११६ कोटींच्या घरात पोहोचली आहेत. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचे ९२.४ कोटी यूजर्स आहेत. भारतातील ऑप्टिकल फायबल केबल १.१० कोटी किलोमीटरची होती, तीच आज ४.१० कोटी किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. 

भारतीय डाटा देशातच राहावा : आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेयरमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी म्हणाले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एआयचे योगदान मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे भारताने तातडीने एआयचा अवलंब करावा. डेटा सेंटर धोरणाचा २०२० मसुदा अद्ययावत करण्याची आम्ही सरकारला विनंती करतो. भारतीय डाटा देशातील डाटा सेंटरमध्येच राहिला पाहिजे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय