शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:19 IST

अभ्यासात देवप्रयाग नदीच्या प्रवाहाचे आकडे वापरून मॉडेलची तपासणी आणि सत्यता पडताळली आहे. 

नवी दिल्ली - जगातील तिसरं सर्वात मोठं ताज्या पाण्याचं स्त्रोत हिमालयात आहे. याठिकाणी हिमपर्वत आणि हिमनद्यातून पाणी वाहत असते. जे कोट्यवधी लोकांची तहान भागवते. गंगा नदीचे उगमस्थान जे हिमालयात आहे, तेही ग्लेशियर्स आणि बर्फावर अवलंबून आहे. मात्र हवामानातील बदलामुळे वाढणारे तापमान आणि बदलते मान्सून वेळापत्रक यामुळे जल प्रणालीवर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे गंगा नदीच्या वरच्या क्षेत्रात पाण्याचा प्रवाह आणि जल संतुलन यावर काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास आयआयटी रुरकीच्या संशोधकांनी केला आहे. 

आयआयटीच्या रिपोर्टमध्ये भविष्यात नदीचं पाणी, बर्फ वितळणे, हिमनदी आणि भूजल कसं बदलेल याचा शोध घेतला आहे. यासाठी त्यांनी विशेष मॉडेल जसं एसपीएचवाय (स्पॅटिकल प्रोसेसज इन हायड्रोलॉजी) आणि सीएमआयपी ६ जलवायू परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती भविष्यातील तापमान आणि मान्सूनमध्ये होणारे बदल याचा अंदाज लावते. अभ्यासात देवप्रयाग नदीच्या प्रवाहाचे आकडे वापरून मॉडेलची तपासणी आणि सत्यता पडताळली आहे. 

निष्कर्ष काय?

सध्याची स्थिती(१९८५-२०१४) देवप्रयाग नदीत एकूण प्रवाहात ६३.३ टक्के पाऊस, १४.९ टक्के बर्फ वितळणे, १९.८ टक्के हिमनदी आणि १० टक्के भूजल यांचा समावेश आहे. या काळात सरासरी एकूण प्रवाह ७९२ क्यूबिक मीटर प्रतिसेकंद होता. ज्यात पाऊस ५०९.५, बर्फ ११७.५, ग्लेशियर ८६.१, भूजल ७८.९ क्यूबिक मीटर प्रतिसेकंदचं योगदान आहे. 

भविष्यातील अंदाज(२०७६-२१००)

  • तापमान आणि अतिवृष्टी - २१ व्या शतकाच्या अखेर विशेषत: SSP5-8.5 परिस्थितीत तापमान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 
  • एकूण प्रवाहात ५० टक्के वाढ - रिपोर्टनुसार, भविष्यात नदीचा एकूण प्रवाह ५० टक्क्यांनी वाढू शकतो. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात होणारी वाढ असेल. त्यानंतर हिमनदी आणि भूजलचा समावेश असेल. 
  • बर्फ वितळणे ५७ टक्क्यांनी कमी होणार - २०९० पर्यंत बर्फ वितळून होणारं पाणी यात ५७ टक्के कमी होऊ शकते. वाढत्या तापमानामुळे वेगाने बर्फ वितळेल त्यामुळे बर्फाचा भंडार कमी होईल.
  • पाण्याची कमतरता नाही - भलेही बर्फ कमी बनेल परंतु पाऊस आणि हिमनदीमुळे पाण्याचा साठा कायम राहील. 

 

हवामान बदलाचा परिणाम काय?

  • वाढत्या तापमानामुळे हिमालयात वेगाने बर्फ विरघळेल. त्यातून भविष्यात बर्फ आणि ग्लेशियरमधून मिळणारे पाणी कमी होऊ शकते.
  • पावसामुळे नद्यांचा प्रवाह वाढेल परंतु ते मान्सून ऋतूत असेल. ज्यामुळे पूर किंवा पूरजन्य परिस्थिती वाढू शकते.
  • पाण्याचा साठा राहिल्याने सिंचन, पेयजल, अन्य गरजांसाठी पाणी मुबलक उपलब्ध असेल.

 

रिपोर्टमध्ये महत्त्वाचे काय?

हिमालय क्षेत्रातील नद्या जसं गंगा, लाखो लोकांची जीवन वाहिनी आहे. या नद्यांमुळे शेती, पेयजल, उद्योगासाठी पाणी मिळते परंतु हवामान बदलामुळे या नद्यांचा प्रवाह बदलत आहे. या रिपोर्टमुळे भविष्यात पाण्याचा अंदाज लावता येईल. या रिपोर्टमुळे सरकारला पूर, दुष्काळ आणि पाण्याच्या कमतरतेसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी मदत मिळेल. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सरकारला योग्य ती पावले वेळीच आखता येतील.  

टॅग्स :Waterपाणी