शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Railway: झोप पूर्ण न झाल्यानं रेल्वे चालवण्यास चालकाचा नकार; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:11 IST

बालामऊ पॅसेंजर ट्रेन मोटरमननं झोप पूर्ण न झाल्याचं कारण देत चालवण्यापासून नकार दिला

शाहजहाँपूर – वाहन चालवताना कधी चालकाला झोप आली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा चालक झोप आली असेल तर गाडी बाजूला घेऊन काही वेळ आराम करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का ट्रेन चालकाला झोप आली म्हणून ट्रेन एकाच ठिकाणी थांबली आहे? नाही ना, पण हे झालंय. उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी अजब गजब प्रकार पाहायला मिळाला.

याठिकाणी बालामऊ पॅसेंजर ट्रेन मोटरमननं झोप पूर्ण न झाल्याचं कारण देत चालवण्यापासून नकार दिला. त्यामुळे तब्बल अडीच तास ट्रेन स्टेशनवरच ताटकळत होती. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. बालामऊ पॅसेंजर गुरुवारी साडे तीन तासाच्या लेटमार्कनं रात्री एकच्या सुमारास शाहजहाँपूर रेल्वे स्टेशनला पोहचली. बालामऊहून जो ड्रायव्हर ट्रेन घेऊन आला होता. त्यालाच पहाटे पुन्हा बालामऊला ट्रेन घेऊन जायची होती. परंतु रात्री उशीरा आल्यामुळे चालकाची झोप पूर्ण झाली नाही.

शुक्रवारी सकाळी ट्रेनची वेळ झाली तरी चालक हजर नव्हता. त्याने झोप पूर्ण न झाल्याने ट्रेन घेऊन जाण्यास नकार दिला. जोपर्यंत झोप पूर्ण होत नाही तोवर ट्रेन चालवू शकत नाही. झोप पूर्ण झाल्यावर ट्रेन घेऊन जातो असं तो म्हणाला. ही ट्रेन सकाळी ७ वाजता पुन्हा बालामऊच्य परतीच्या प्रवासाला जाणार होती. परंतु चालकाची झोप पूर्ण होईपर्यंत तब्बल ९.३० वाजेपर्यंत ही ट्रेन शाहजहाँपूर स्टेशनवरच थांबली होती. चालकाची झोप पूर्ण झाल्यावर तो ट्रेन चालवण्यासाठी आला. त्याने रोजापर्यंत ट्रेन चालवली त्यानंतर दुसऱ्या चालकाने रोजा ते बालामऊ असा प्रवास केला.

शाहजहाँपूर स्टेशन मास्टर जे पी सिंह म्हणाले की, लोको पायलट बालामऊहून ही ट्रेन रोजापर्यंत आणतात. रोजामध्ये रात्री आराम करुन सकाळी लोको पायलट ट्रेन पुन्हा घेऊन जातात. परंतु रात्री झोप पूर्ण न झाल्याने चालकाने सकाळी ट्रेन घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर त्याची झोप पूर्ण झाली आणि तो ट्रेन घेऊन रवाना झाला. मात्र घडलेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे