शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकत्र कुटुंबाच्या संपत्तीची वाटणी कशी करता येईल?; सर्वोच्च न्यायालयाने सांगितला सोपा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 22:47 IST

पाहा काय म्हटलंय सर्वोच्च न्यायलयानं.

नवी दिल्ली : एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे वाटप (Property Distribution) सर्व भागदारकांच्या संमतीनेच होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंगळवारी स्पष्ट केले. याशिवाय ज्यांची संमती मिळालेली नाही अशा भागधारकांच्या हरकतीवरून हे वाटप रद्द केलं जाऊ शकतं असं यायमूर्ती एसए नझीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितलं.

एकत्र कुटुंब मालमत्तेचा कर्ता एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेची केवळ तीन परिस्थितींमध्ये विभागणी करू शकतो - कायदेशीर आवश्यकता, मालमत्तेच्या फायद्यासाठी आणि कुटुंबातील सर्व भागधारकांच्या संमतीने सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हा एक प्रस्थापित कायदा आहे, जेथे सर्वांच्या सहमतीनं वाटप केलं गेलं नसेल तर त्या भागीदाराच्या सांगण्यावरून ते रद्द होऊ शकते, असं न्यायालयानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपिलावर केले होते. यात केसी चंद्रपा गौडा यांनी त्यांचे वडिल केएस चिन्ना गौडांनी त्यांच्या मालमत्तेचा एका तृतीयांश भाग एका मुलीला भेट देण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही संपत्ती त्यांच्या एकत्रित कुटुंबाची होती.

लाभार्थी कुटुंबातील सदस्य नसल्याने त्याच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण कायदेशीररित्या वैध नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. यापूर्वी न्यायालयानं मालमत्ता भेट देण्याच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु आता तो सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने अपील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

दम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका खटल्याची सुनावणी करताना आदेश दिला की अविभक्त हिंदू कुटुंबातील वडील किंवा इतर व्यक्ती केवळ 'चांगल्या कारणासाठी' वडिलोपार्जित मालमत्ता भेट देऊ शकतात. चांगले कारण म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दानधर्मासाठी दिलेली भेट आहे, असंही न्यायालयानं म्हटलं. एखाद्याला प्रेमाने किंवा आपुलकीने भेटवस्तू देणे म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता 'चांगल्या कारणासाठी' भेट देण्यासारखे होणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय