शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:57 IST

सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात तब्बल १२ ते १८ महिन्यांपासून ठप्प झालेली कर्मचारी भरती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील सुमारे दीड वर्षाच्या काळात कर्मचारी भरतीला तर ‘ब्रेक’ लागलेला होताच, पण मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात होती. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. मात्र, या क्षेत्राचे दुर्दशेचे दशावतार आता संपत आल्याचे संकेत मिळत आहेत.

आघाडीची भरती संस्था ‘एक्सफेनो’च्या आकडेवारीनुसार, भरतीतील सुधारणेत अजून स्थैर्य स्पष्टपणे दिसत नसले तरी काही चांगले संकेत मिळत आहेत. वित्त वर्ष २०२५ मधील पहिल्या ५ महिन्यांत आयटी क्षेत्रातील सेवा व उत्पादने तसेच स्टार्टअप क्षेत्रांतील भरतीत धीमी वाढ दिसून येत आहे.एक्सफेनोचे सहसंस्थापक अनिल एथनुर यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील अडथळ्यांमुळे आयटी कंपन्यांना खर्चात कपात करावी लागली होती. त्याचा थेट परिणाम भरतीवर झाला होता.

नोकरी विषयक सल्लागार हितेश ओबेरॉय यांनी सांगितले की, आता आयटी कंपन्यांत सर्व पातळ्यांवर भरती दिसून येत आहे. कॅम्पस भरतीही वाढत आहे. मागील काही महिन्यांत आयटी कंपन्यांनी मोठ्या संख्येने भरती केली आहे. मागील २ ते ४ तिमाहींच्या तुलनेत भरतीत वाढ झाली आहे. नाेकर भरतीतील वाढीसोबतच नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढेल तसेच वेतनातही वाढ होईल, असे अपेक्षित आहे.

८५ टक्के कर्मचाऱ्यांची  मागणी ही टीयर १ शहरांमध्येच सध्या आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत मे २०२४ च्या तुलनेत फक्त २५ टक्केच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्चांकी मागणीच्या तुलनेत तर ती अजूनही ५० टक्के कमी आहे.

स्टार्टअप्समध्येही लागणार मनुष्यबळ

- भारतातील स्टार्टअप्सनी सुमारे ३० हजार लाेकांना कामावरुन काढले हाेते. मात्र, आता या क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. कंपन्यांना ४०-५० टक्के वाढ हवी आहे. 

- मात्र, मनुष्यबळाशिवाय ते साध्य हाेणार नाही. फार माेठी नाही, परंतु काही प्रमाणात या स्टार्टअप्समध्ये नाेकर भरती सुरू हाेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :jobनोकरी