शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:57 IST

सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात तब्बल १२ ते १८ महिन्यांपासून ठप्प झालेली कर्मचारी भरती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील सुमारे दीड वर्षाच्या काळात कर्मचारी भरतीला तर ‘ब्रेक’ लागलेला होताच, पण मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात होती. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. मात्र, या क्षेत्राचे दुर्दशेचे दशावतार आता संपत आल्याचे संकेत मिळत आहेत.

आघाडीची भरती संस्था ‘एक्सफेनो’च्या आकडेवारीनुसार, भरतीतील सुधारणेत अजून स्थैर्य स्पष्टपणे दिसत नसले तरी काही चांगले संकेत मिळत आहेत. वित्त वर्ष २०२५ मधील पहिल्या ५ महिन्यांत आयटी क्षेत्रातील सेवा व उत्पादने तसेच स्टार्टअप क्षेत्रांतील भरतीत धीमी वाढ दिसून येत आहे.एक्सफेनोचे सहसंस्थापक अनिल एथनुर यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील अडथळ्यांमुळे आयटी कंपन्यांना खर्चात कपात करावी लागली होती. त्याचा थेट परिणाम भरतीवर झाला होता.

नोकरी विषयक सल्लागार हितेश ओबेरॉय यांनी सांगितले की, आता आयटी कंपन्यांत सर्व पातळ्यांवर भरती दिसून येत आहे. कॅम्पस भरतीही वाढत आहे. मागील काही महिन्यांत आयटी कंपन्यांनी मोठ्या संख्येने भरती केली आहे. मागील २ ते ४ तिमाहींच्या तुलनेत भरतीत वाढ झाली आहे. नाेकर भरतीतील वाढीसोबतच नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढेल तसेच वेतनातही वाढ होईल, असे अपेक्षित आहे.

८५ टक्के कर्मचाऱ्यांची  मागणी ही टीयर १ शहरांमध्येच सध्या आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत मे २०२४ च्या तुलनेत फक्त २५ टक्केच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्चांकी मागणीच्या तुलनेत तर ती अजूनही ५० टक्के कमी आहे.

स्टार्टअप्समध्येही लागणार मनुष्यबळ

- भारतातील स्टार्टअप्सनी सुमारे ३० हजार लाेकांना कामावरुन काढले हाेते. मात्र, आता या क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. कंपन्यांना ४०-५० टक्के वाढ हवी आहे. 

- मात्र, मनुष्यबळाशिवाय ते साध्य हाेणार नाही. फार माेठी नाही, परंतु काही प्रमाणात या स्टार्टअप्समध्ये नाेकर भरती सुरू हाेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :jobनोकरी