शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:57 IST

सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात तब्बल १२ ते १८ महिन्यांपासून ठप्प झालेली कर्मचारी भरती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील सुमारे दीड वर्षाच्या काळात कर्मचारी भरतीला तर ‘ब्रेक’ लागलेला होताच, पण मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात होती. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. मात्र, या क्षेत्राचे दुर्दशेचे दशावतार आता संपत आल्याचे संकेत मिळत आहेत.

आघाडीची भरती संस्था ‘एक्सफेनो’च्या आकडेवारीनुसार, भरतीतील सुधारणेत अजून स्थैर्य स्पष्टपणे दिसत नसले तरी काही चांगले संकेत मिळत आहेत. वित्त वर्ष २०२५ मधील पहिल्या ५ महिन्यांत आयटी क्षेत्रातील सेवा व उत्पादने तसेच स्टार्टअप क्षेत्रांतील भरतीत धीमी वाढ दिसून येत आहे.एक्सफेनोचे सहसंस्थापक अनिल एथनुर यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील अडथळ्यांमुळे आयटी कंपन्यांना खर्चात कपात करावी लागली होती. त्याचा थेट परिणाम भरतीवर झाला होता.

नोकरी विषयक सल्लागार हितेश ओबेरॉय यांनी सांगितले की, आता आयटी कंपन्यांत सर्व पातळ्यांवर भरती दिसून येत आहे. कॅम्पस भरतीही वाढत आहे. मागील काही महिन्यांत आयटी कंपन्यांनी मोठ्या संख्येने भरती केली आहे. मागील २ ते ४ तिमाहींच्या तुलनेत भरतीत वाढ झाली आहे. नाेकर भरतीतील वाढीसोबतच नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढेल तसेच वेतनातही वाढ होईल, असे अपेक्षित आहे.

८५ टक्के कर्मचाऱ्यांची  मागणी ही टीयर १ शहरांमध्येच सध्या आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत मे २०२४ च्या तुलनेत फक्त २५ टक्केच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्चांकी मागणीच्या तुलनेत तर ती अजूनही ५० टक्के कमी आहे.

स्टार्टअप्समध्येही लागणार मनुष्यबळ

- भारतातील स्टार्टअप्सनी सुमारे ३० हजार लाेकांना कामावरुन काढले हाेते. मात्र, आता या क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. कंपन्यांना ४०-५० टक्के वाढ हवी आहे. 

- मात्र, मनुष्यबळाशिवाय ते साध्य हाेणार नाही. फार माेठी नाही, परंतु काही प्रमाणात या स्टार्टअप्समध्ये नाेकर भरती सुरू हाेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :jobनोकरी