शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

स्थिती चिंताजनक; शेषनसारखे निवडणूक आयुक्त देशाला हवेत; नियुक्तीच्या पद्धतीत संसदेने सुधारणा करावी, SC चे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 07:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने देशातील स्थिती चिंताजनक असून दबावाला बळी न पडणाऱ्या दिवंगत टी. एन. शेषन यांच्यासारख्या व्यक्तीला निवडणूक आयुक्त बनवण्याची गरज व्यक्त केली आहे. सदस्यांच्या नियुक्तीत संसदेने सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने देशातील स्थिती चिंताजनक असून दबावाला बळी न पडणाऱ्या दिवंगत टी. एन. शेषन यांच्यासारख्या व्यक्तीला निवडणूक आयुक्त बनवण्याची गरज व्यक्त केली आहे. सदस्यांच्या नियुक्तीत संसदेने सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने केंद्र सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. २००७ पासून सर्व मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ पूर्ण होत नाही, यूपीए आणि सध्याच्या सरकारच्या काळातही आम्ही हे पाहिले आहे, असा सवाल न्यायालयाने केला. या घटनापीठात न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांचा समावेश आहे. 

स्वातंत्र्य आणि कामावरही परिणाम - आम्ही संसदेला काहीही करण्यास सांगू शकत नाही आणि आम्ही तसे करणार नाही. १९९० पासून जो मुद्दा मांडला जात आहे त्यावर आम्हाला काहीतरी करायचे आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. 

- निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीमध्ये संसदेने सुधारणा करण्याची गरज आहे, कारण त्याचा परिणाम निवडणूक आयोगाच्या कामकाजावर होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आयोगावर सदस्य नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांचा समावेश करा -मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सल्लागार प्रक्रियेत सरन्यायाधीशांचा समावेश केल्याने निवडणूक पॅनेलचे स्वातंत्र्य सुनिश्चित होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. सत्ताधारी पक्षाला सत्तेत राहणे आवडते आणि सध्याच्या व्यवस्थेत निवडणूक पदावर एखाद्या ‘होयबा’ची नियुक्ती होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारखी प्रणाली मागणाऱ्या याचिकांवर न्यायालय सुनावणी करत होते. 

घटनेने सोपविलेली महत्त्वाची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांच्या खांद्यावर राज्यघटनेने बरीच जबाबदारी टाकली आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी. एन. शेषन यांच्यासारख्या भक्कम स्वभावाच्या व्यक्तीची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

माजी कायदामंत्री मोईलींचे समर्थन - माजी केंद्रीय कायदा मंत्री एम. वीरप्पा मोईली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी बुधवारी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी सल्लागार यंत्रणा स्थापन करण्यास पाठिंबा दर्शविला. सल्लागार यंत्रणा स्थापन केलीच पाहिजे. - जर तुम्हाला न्यायपालिका आणि निवडणूक आयोग दोन्ही स्वतंत्र हवे असतील तर मुख्य. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल सहा वर्षांसाठी असावा, असे मोईली म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCourtन्यायालयParliamentसंसद