शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

केंद्र सरकार बक्कळ देतेय पैसे, राज्य सरकार खर्च करेना; योजनांवर एक लाख कोटी रुपये खर्चच केले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:09 IST

योजनांसाठी राज्यांना पाठवलेली सुमारे १ लाख कोटी रुपयांची रक्कम राज्यांच्या सिंगल नोडल एजन्सी (एसएनए) खात्यात जमा केली जाते. मात्र ही रक्कम राज्यांनी वापरलेली नाही. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही प्रधानमंत्री आवास योजनेची (ग्रामीण) आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशभरात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडून राज्य सरकारांना निधीही दिला जातो. मात्र या निधीतील अधिकाधिक रक्कम खर्च करणे राज्य सरकारांना जमले नसल्याचे समोर आले. अहवालानुसार कल्याण निधीचे सुमारे एक लाख कोटी रुपये राज्यांच्या खात्यात पडून आहेत.

योजनांसाठी राज्यांना पाठवलेली सुमारे १ लाख कोटी रुपयांची रक्कम राज्यांच्या सिंगल नोडल एजन्सी (एसएनए) खात्यात जमा केली जाते. मात्र ही रक्कम राज्यांनी वापरलेली नाही. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही प्रधानमंत्री आवास योजनेची (ग्रामीण) आहे.

सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...

१.६ लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनांसाठी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या सुधारित अंदाजापेक्षा ही रक्कम ७.२ टक्के अधिक आहे.

...तर अर्थसंकल्पात तरतूद कमी केली जाणार

सरकारने यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही या न वापरलेल्या निधीचा उल्लेख केला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकार किंवा राज्ये त्यांच्या विकासासाठी किंवा कल्याणकारी योजनांसाठी कर्ज घेतात.

निधीवर या यंत्रणेची पूर्ण नजर असते. जर खात्यात रक्कम जमाच राहिली तर या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद कमी केली जाण्याची शक्यता आहे.