शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ब्रिटिशांना जशास तसे उत्तर! दिल्लीतील उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:37 IST

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दुतावासावरील तिरंग्याचा अपमान केला होता. ब्रिटनमधील दुतावासासमोर खलिस्तानींनी आठवड्याभरात दोनदा हिंसक आंदोलन केले होते. यावर वारंवार निषेध नोंदवूनही ब्रिटीश सुरक्षा यंत्रणेने काही कारवाई केली नव्हती. यामुळे भारताने देखील ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. या दोन्ही इमारतींसमोर बॅरिकेड्स लावून बंदुकधारी पोलीस सुरक्षा असते. ती हटविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे अन्य देशांच्या उच्चायुक्तालयासमोर नेहमीप्रमाणेच सुरक्षा आहे. या बॅरिकेड्सना सुरक्षा व्यवस्थेचा पहिली फळी मानली जाते. 

खलिस्तान समर्थकांनी अलीकडच्या काळात ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा वाणिज्य दूतावासांसमोर हिंसक निदर्शने केली आहेत. भारताने या सर्व देशांकडे चिंता व्यक्त केली होती. रविवारच्या घटनेनंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रभारी राजदूतालाही बोलावले आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने या दोन्ही देशांना आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवावी, असे अनेकदा सांगितले आहे. 

आजचे हे पाऊल ब्रिटनला कुटनीतीत अडकविण्यासाठी उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Punjabपंजाब