शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

ब्रिटिशांना जशास तसे उत्तर! दिल्लीतील उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:37 IST

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दुतावासावरील तिरंग्याचा अपमान केला होता. ब्रिटनमधील दुतावासासमोर खलिस्तानींनी आठवड्याभरात दोनदा हिंसक आंदोलन केले होते. यावर वारंवार निषेध नोंदवूनही ब्रिटीश सुरक्षा यंत्रणेने काही कारवाई केली नव्हती. यामुळे भारताने देखील ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. या दोन्ही इमारतींसमोर बॅरिकेड्स लावून बंदुकधारी पोलीस सुरक्षा असते. ती हटविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे अन्य देशांच्या उच्चायुक्तालयासमोर नेहमीप्रमाणेच सुरक्षा आहे. या बॅरिकेड्सना सुरक्षा व्यवस्थेचा पहिली फळी मानली जाते. 

खलिस्तान समर्थकांनी अलीकडच्या काळात ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा वाणिज्य दूतावासांसमोर हिंसक निदर्शने केली आहेत. भारताने या सर्व देशांकडे चिंता व्यक्त केली होती. रविवारच्या घटनेनंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रभारी राजदूतालाही बोलावले आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने या दोन्ही देशांना आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवावी, असे अनेकदा सांगितले आहे. 

आजचे हे पाऊल ब्रिटनला कुटनीतीत अडकविण्यासाठी उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Punjabपंजाब