शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अधिवेशनाचा अजेंडा माहिती नाही, पण ९ मुद्द्यांवर करा चर्चा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 06:57 IST

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून १८ सप्टेंबरपासून ...

- आदेश रावलनवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महागाई, देशाची आर्थिक परिस्थिती, चिनी घुसखोरी, जातिगणना या विषयांवर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.या शिवाय सीमेवरील कोंडी आणि अदानी समूहाशी संबंधित नवीन खुलासे या पार्श्वभूमीवर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याच्या मागणीसह नऊ मुद्द्यांवर योग्य नियमांनुसार चर्चा व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या. ‘राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनाचा अजेंडा आम्हाला माहीत नाही’, असेही त्या म्हणाल्या.

देशाची आर्थिक स्थिती, शेतकरी संघटनांसोबतचे करार, अदानी समूहाशी संबंधित जेपीसीची मागणी, जातिगणनेची मागणी, संघराज्यीय रचनेवर होणारे हल्ले, नैसर्गिक आपत्तीचे परिणाम, चीनच्या सीमेवरील तणाव, देशाच्या काही भागातील जातीय तणाव आणि मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेच्या विशेष अधिवेशनात या विषयांवर चर्चा होईल, अशी अपेक्षाही सोनिया गांधी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षांशी सल्लामसलत नाही : खरगेपक्षांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, केंद्र सरकार पहिल्यांदाच अजेंडा जाहीर न करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत आहे. कोणत्याही विरोधी पक्षाशी सल्लामसलत किंवा माहिती देण्यात आली नाही. लोकशाही चालवण्याचा हा मार्ग नाही.

‘इंडिया’ विशेष अधिवेशनात सहभागी होणारविरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सहभागी असलेल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची मंगळवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक झाली. आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या २८ पक्षांपैकी २४ पक्ष १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आला.

पत्रातील ९ मुद्दे कोणते?

  • महागाई, बेरोजगारी आणि एमएसएमई
  • सरकारने एमएसपीला कायदेशीर हमी देण्याबाबत वक्तव्य केले होते, त्याची सध्याची सध्याची स्थिती काय आहे.
  • अदानी प्रकरणात जेपीसी
  • जातिगणना व जनगणना
  • संघराज्य संरचनांवर होणारे हल्ले आणि बिगर-भाजप शासित राज्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणे.
  • हिमाचल प्रदेशातील पुरासारखी आपत्ती आणि अनेक राज्यांतील भीषण दुष्काळी परिस्थिती
  • लडाख-अरुणाचल प्रदेश सीमेवर चीनने केलेली घुसखोरी
  • हरयाणासारख्या अनेक राज्यांमध्ये पसरलेला जातीय तणाव
  • मणिपूर हिंसाचारावर सरकारची भूमिका
टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी