शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या वारशासाठी श्रेयवाद!

By admin | Updated: May 31, 2015 02:16 IST

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला.

केंद्राची विशेष समिती : डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीसाठी योजनांचा धडाकानवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वारसा हक्कावरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विविध मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती आणि त्याअनुषंगाने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत सल्ला देईल. या समितीत राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम. वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, सदानंद गौडा, रामविलास पासवान आणि सुरेश प्रभू या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आणि सिद्धान्तांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने १६ मोठे प्रकल्प राबविले जाणार असून, याची माहिती बैठकीत देण्यात आली. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे दलित समुदायाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नांतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या महत्त्वाच्या हिंदीभाषिक राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी दलित आणि महादलित समुदायाची मने जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे. भारताच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या म. गांधी, डॉ. आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा आदर्श जनतेपुढे ठेवण्यासाठी आपले सरकार काय करणार आहे, याची ढोबळ रूपरेषा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केली होती. त्यानुसार त्यांनी इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा कित्येक वर्षे भिजत पडलेला प्रश्न मार्गी लावला व गुजरातमध्ये सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची योजनाही जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.अशा आहेत विविध योजना दिल्लीत १५, जनपथ येथे सुमारे १९७ कोटी रुपये खर्चून आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र100 विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबिया आणि लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणासाठी पाठविणार14 एप्रिलला राष्ट्रीय बंधुभाव समरसता दिवस26 अलीपूर, दिल्ली येथे आंबेडकर स्मारकडॉ. आंबेडकर स्मृती टपाल तिकीट व शिक्केआंबेडकर फाउंडेशनतर्फे व्याख्यानमालाबाबासाहेबांशी महत्त्वाच्या स्थळांचा विकास