शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

बाबासाहेबांच्या वारशासाठी श्रेयवाद!

By admin | Updated: May 31, 2015 02:16 IST

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला.

केंद्राची विशेष समिती : डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीसाठी योजनांचा धडाकानवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वारसा हक्कावरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विविध मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती आणि त्याअनुषंगाने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत सल्ला देईल. या समितीत राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम. वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, सदानंद गौडा, रामविलास पासवान आणि सुरेश प्रभू या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आणि सिद्धान्तांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने १६ मोठे प्रकल्प राबविले जाणार असून, याची माहिती बैठकीत देण्यात आली. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे दलित समुदायाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नांतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या महत्त्वाच्या हिंदीभाषिक राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी दलित आणि महादलित समुदायाची मने जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे. भारताच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या म. गांधी, डॉ. आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा आदर्श जनतेपुढे ठेवण्यासाठी आपले सरकार काय करणार आहे, याची ढोबळ रूपरेषा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केली होती. त्यानुसार त्यांनी इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा कित्येक वर्षे भिजत पडलेला प्रश्न मार्गी लावला व गुजरातमध्ये सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची योजनाही जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.अशा आहेत विविध योजना दिल्लीत १५, जनपथ येथे सुमारे १९७ कोटी रुपये खर्चून आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र100 विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबिया आणि लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणासाठी पाठविणार14 एप्रिलला राष्ट्रीय बंधुभाव समरसता दिवस26 अलीपूर, दिल्ली येथे आंबेडकर स्मारकडॉ. आंबेडकर स्मृती टपाल तिकीट व शिक्केआंबेडकर फाउंडेशनतर्फे व्याख्यानमालाबाबासाहेबांशी महत्त्वाच्या स्थळांचा विकास