शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयसीएसई बोर्डात भारतात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:16 IST

तीन विषयांत १०० पैकी १०० गुण; दहावीचाही निकाल झाला जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/मुंबई : बारावीच्या आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग भारतातून पहिला आला आहे. त्याला ९९.७५ टक्के (३९९/४००) गुण मिळाले आहेत.

रेहान हा पोखरण रोड क्रमांक २ येथे राहतो. मी कला शाखेत शिकत असून या शाखेत पदवी घेणार आहे. त्याचबरोबर, यूपीएससीची तयारी करणार आहे. इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या तीन विषयांत १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय  शिक्षक, पालक, मित्रांचे असल्याचे रेहानने सांगितले. 

विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेला फाटा देत टॉपर्सची नावे टाळून कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता घेतलेल्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर केला. दहावीचा ९९.४७ टक्के तर, बारावी परीक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे.देशभरातून परीक्षा देणाऱ्या २,४३,६१७ पैकी २,४२,३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १,१३,१११ विद्यार्थिनींचा समावेश असून १,१२,७१६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९९.६५ टक्के, तर १,३०,५०६ मुलांपैकी १,२९,६१२ मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण ९९.३१ टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत चांगली राहिली. 

भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याची इच्छारेहान म्हणाला की, माझे आई-वडील, आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणे हेच स्वप्न आणि ध्येय आहे.

महाराष्ट्राची कामगिरीमहाराष्ट्रातून २८,५८८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बारावीची परीक्षा ३,८४० विद्यार्थ्यांनी दिली. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७१ टक्के इतके आहे.

सुधारण्याची संधीविद्यार्थ्यांना गुणांविषयी शंका असल्यास पेपर रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करता येईल. त्याकरिता एक ते दीड हजार रुपये शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन विषयांना पुन्हा बसून आपला निकाल सुधारता येईल. या परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.दहावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) १५,०२५ विद्यार्थ्यांपैकी ९९.११ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बारावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) ५,१९४ विद्यार्थ्यांपैकी ९७.७१ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या (एसटी) ३,६०० विद्यार्थ्यांपैकी ९६.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :examपरीक्षा