शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटले

By admin | Updated: August 8, 2014 03:14 IST

पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे.

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८  - पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे. विशेष म्हणजे पाठपुस्तक मंडळाच्या पदाधिका-यांनी याचे समर्थनही केले असून त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी या शब्दांचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
पश्चिम बंगालमधील आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात रिव्हॉल्यूशनरी टेररिझम हा धडा आहे. या धड्यात शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी या स्वातंत्रसैनिकांना जहाल आणि दहशतवादी म्हणून संबोधिले आहे. '१९०८ नंतर स्वातंत्र्यलढ्यातील काही लोकांनी दहशतवादी मार्ग स्वीकारला. त्यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ले केले. या दहशतवादी गटाचे कट समोर येऊ लागल्यावर त्याचे समाजावर परिणाम झाले. काही जण त्यांच्या विचारांशी सहमत असले तरी अनेकांना हा मार्ग रुचला नव्हता' असा उल्लेख या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. 
स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटल्याने पश्चिम बंगालमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. खुदीराम बोस, चाकी यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणणारे उद्या सुभाषचंद्र बोस यांनाही दहशतवादी म्हणतील का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणून संबोधित करुन केवळ सत्यस्थिती बदलण्यात आली नाही. तर यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला आहे असे इतिहासतज्ज्ञ अतिश दासगुप्ता यांनी सांगितले. 
राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिका-याने धड्यात दहशतवादी शब्दाचा वापर हा त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी केला आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र इतिहासातील घडामोडींविषयी शद्बप्रयोग करताना पाठ्यपुस्तक मंडळाने सावधपणे काम करायला पाहिजे असे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने याविषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. 
या घटनेनंतर पाठ्यपुस्तक मंडळाने इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारीही सुरु केल्याचे समजते. सध्याच्या इतिहासातील धडे हे काही अंशी डाव्या विचारांकडे झुकतात. अभ्यासक्रमात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या व्यक्तींवरील धडे आणण्याची गरज असल्याचे एका अधिका-याने सांगितले.