शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटले

By admin | Updated: August 8, 2014 03:14 IST

पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे.

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८  - पश्चिम बंगालमधील आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख चक्क दहशतवादी म्हणून करण्यात आल्याची संतप्त घटना समोर आली आङे. विशेष म्हणजे पाठपुस्तक मंडळाच्या पदाधिका-यांनी याचे समर्थनही केले असून त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी या शब्दांचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
पश्चिम बंगालमधील आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात रिव्हॉल्यूशनरी टेररिझम हा धडा आहे. या धड्यात शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी या स्वातंत्रसैनिकांना जहाल आणि दहशतवादी म्हणून संबोधिले आहे. '१९०८ नंतर स्वातंत्र्यलढ्यातील काही लोकांनी दहशतवादी मार्ग स्वीकारला. त्यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ले केले. या दहशतवादी गटाचे कट समोर येऊ लागल्यावर त्याचे समाजावर परिणाम झाले. काही जण त्यांच्या विचारांशी सहमत असले तरी अनेकांना हा मार्ग रुचला नव्हता' असा उल्लेख या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. 
स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हटल्याने पश्चिम बंगालमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. खुदीराम बोस, चाकी यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणणारे उद्या सुभाषचंद्र बोस यांनाही दहशतवादी म्हणतील का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना दहशतवादी म्हणून संबोधित करुन केवळ सत्यस्थिती बदलण्यात आली नाही. तर यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला आहे असे इतिहासतज्ज्ञ अतिश दासगुप्ता यांनी सांगितले. 
राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिका-याने धड्यात दहशतवादी शब्दाचा वापर हा त्यावेळची परिस्थिती मांडण्यासाठी केला आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र इतिहासातील घडामोडींविषयी शद्बप्रयोग करताना पाठ्यपुस्तक मंडळाने सावधपणे काम करायला पाहिजे असे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने याविषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. 
या घटनेनंतर पाठ्यपुस्तक मंडळाने इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची तयारीही सुरु केल्याचे समजते. सध्याच्या इतिहासातील धडे हे काही अंशी डाव्या विचारांकडे झुकतात. अभ्यासक्रमात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या व्यक्तींवरील धडे आणण्याची गरज असल्याचे एका अधिका-याने सांगितले.