शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, आठ जवान शहीद, सातारच्या रवींद्र धनावडेंना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 06:02 IST

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही अतिरेक्यांना ठार केले आहे.अलीकडील काळातील हा काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हे तिन्ही दहशतवादी परदेशी होते, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात इतके जवान व पोलीस हुतात्मा होणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे.अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान मरण पावले, तर आॅपरेशन पूर्ण झाल्यानंतर अतिरेक्यांनी टाकलेले बॉम्ब निकामी करताना दोघांना मरण आले.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अतिरेकी पोलीस वसाहत असलेल्या भागात घुसले. त्या कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांची अनेक घरे व पोलिसांची कार्यालये आहेत. अतिसुरक्षित म्हणून ओळखला जाणारा व कडेकोट बंदोबस्त असलेला हा भाग आहे. अशा ठिकाणी हे दहशतवादी कसे घुसले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ते गोळीबार करीतच कॉम्प्लेक्समध्ये घुसले. पोलिसांच्या इमारतीतून त्यांनी बाहेरच्या दिशेने ग्रेनेडही फेकले. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व पोलीस जखमी झाले. पहाटे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सारेच काहीसे गोंधळून गेले. मात्र लगेच जवान व पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला. हे आॅपरेशन १५ तास चालले. त्यानंतर तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)चकमक संध्याकाळी संपलीत्या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही.सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.पाकच्या तीन रेंजर्सचा खात्माजम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या पडगवाल भागात गोळीबार केला. तथापि, सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाºयाने सांगितले.धनावडे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते केवळ आठ महिनेसातारा : काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना धनावडे यांना वीरमरण आले.सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले.रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. - वृत्त/३

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान