शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 08:25 IST

बैठकीत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी 'ऑल आउट'च्या धर्तीवर मोठ्या मोहिमेची व्यूहरचना तयार केली जाणार आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमरनाथ यात्रा आणि जम्मू आणि काश्मीरमधील वाढत्या दहशतवादाविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दहशतवाद्यांविरुद्ध केंद्र सरकारच्या सर्वांत मोठ्या मोहिमेची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.

गृहमंत्री शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक होईल. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, इंटेलिजन्स विभागाचे संचालक, 'रॉ'चे प्रमुख, बीएसएफचे महासंचालक यांच्यासह सुरक्षाविषयक तज्ज्ञ सहभागी होतील. बैठकीत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी 'ऑल आउट'च्या धर्तीवर मोठ्या मोहिमेची व्यूहरचना तयार केली जाणार आहे. प्रथमच या मोहिमेत मोठ्या भूमिकेसाठी हवाई दलाला सज्ज राहण्यास सांगण्यात येणार आहे.

सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी

केंद्र सरकार जम्मू आणि काश्मिरातील राष्ट्रपती राजवट उठविण्याच्या तयारीत आहे. तेथे सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची सरकारची योजना आहे. शेजा राष्ट्र पाकिस्तानकडून या निवडणुकीत व्यत्यय आणण्यासाठीच्या कारवाया वाढू शकतात. घुसखोरी व दहशतवादी घटनांत वाढ होऊ शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरसाठी व्यूहरचना तयार करत आहे. 

जखमींपैकी १० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती येथील श्री माता वैष्णोदेवी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली. तसेच हल्ल्यात गंभीर जखमी एकूण १५ रुग्णांपैकी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ५ रुग्ण अजूनही निरीक्षणाखाली आहेत आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

डीप फेक, फेक न्यूजसाठी सरकार आणणार विधेयक

डीप फेक आणि फेक न्यूजसारखे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, डीप फेक, फेक न्यूज आज मोठे आव्हान बनले आहे.

तंत्रज्ञानाचा गैरवापर  रोखण्यासाठी सरकार स्वतःचे नियम बनवेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एआयच्या समस्यांना तोंड दिले आहे. या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सरकार लवकरच संसदेत डिजिटल इंडिया विधेयक आणणार आहे. त्यानंतर डीप फेक, फेक न्यूजवर बंदी येईल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद