शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला, कॅप्टनसह चार जवान शहीद; घेराव घातला असता केला गोळीबार शोधमोहीम अद्याप सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 04:01 IST

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला.

सुरेश एस. डुग्गर

जम्मू :जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसहित चार जवान शहीद तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने दोडातील देसा येथील वन क्षेत्रात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे कॅप्टन  ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान बिजेंद्र सिंह, अजयकुमार सिंह हे चार जण शहीद झाले, तर जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा जवान गंंभीर जखमी झाला आहे. पण त्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. शहीद जवानांपैकी कॅप्टन बृजेश थापा हे दार्जिलिंगच्या लेबोंग येथील रहिवासी आहेत.

शोधमोहिमेत ड्रोन, हेलिकॉप्टरचीही मदत

धारी गोटे उरारबागी परिसरात लष्कर व पोलिसांनी आणखी कुमक मागविली व मंगळवारी सकाळपासून पुन्हा दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरचीही मदत घेतली आहे. हे दहशतवादी काही महिन्यांपूर्वी सीमा ओलांडून काश्मीरमध्ये आले व जंगलात दडून बसले होते.

तीन आठवड्यांत तिसरी मोठी चकमक

गेल्या तीन आठवड्यांत दोडा जिल्ह्यामध्ये झालेली ही तिसरी मोठी चकमक आहे. आठवडाभरापूर्वी कठुआ जिल्ह्यातील मचेडी वन क्षेत्रात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद व काही जवान जखमी झाले होते.

सोमवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. त्यावेळी दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; पण कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.

त्यानंतर पुन्हा सोमवारी चकमक झाली. त्यावेळी कॅप्टनसहित चार जवान शहीद झाले. त्यांना लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी व अन्य लष्करी अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर