शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा; सरकार म्हणते, परवानगी नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:19 IST

राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. 

- बलवंत तक्षक

चंडीगड : हरयाणातील नूह येथे जलअभिषेक यात्रेचे आयोजन करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही हिंदू महापंचायतीने २८ ऑगस्टला जलअभिषेक यात्रा काढणार असल्याचे स्पष्ट केल्याने तणाव वाढला आहे. यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, इंटरनेट, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी पंचकुलामध्ये सांगितले की, यात्रेला परवानगी दिलेली नाही. यात्रेत सहभागी होण्याऐवजी लोक आपापल्या भागातील मंदिरांमध्ये जलाभिषेकसाठी जाऊ शकतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. 

ते म्हणतात...परवानगीची गरज नाही- सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने २६ ते २८ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. - नूह येथील पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलाच्या २४ तुकड्यांशिवाय हरयाणा पोलिसांचे १,९०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केएमपी द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरूच राहणार आहे. - यात्रेचे आयोजन करणाऱ्या विहिंपने म्हटले आहे की, मिरवणूक काढण्यात येणार असून, अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही.

हरयाणा सुरक्षित, चिंता करू नकाहरयाणा सुरक्षित असून, कोणीही त्याची चिंता करू नये. जर राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर ती पंजाबमध्ये लावण्याची गरज आहे.     - मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री, हरयाणा  

टॅग्स :Haryanaहरयाणा