शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये राम नाईक, अखिलेश यादव यांच्यात तणातणी

By admin | Updated: October 21, 2014 03:06 IST

राज्यपालांची भूमिका समांतर सरकारची वा ‘राजकीय अतिसक्रियतेमुळे’ असल्याची टीका सत्ताधारी समाजवादी पार्टीच्या गोटातून सुरू झाल्याने ताण-तणाव वाढला आहे.

रघुनाथ पांडे, लखनौमुख्यमंत्र्यांनी जनतेच्या कामात लक्ष घातले नाही तर आपण केंद्राकडे मुख्यमंत्र्यांचा अहवाल देऊ, असे जाहीर वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संभाव्य संघर्षाची स्पष्ट चाहूल लागली आहे. त्यातूनच राज्यपालांची भूमिका समांतर सरकारची वा ‘राजकीय अतिसक्रियतेमुळे’ असल्याची टीका सत्ताधारी समाजवादी पार्टीच्या गोटातून सुरू झाल्याने ताण-तणाव वाढला आहे. नाईक यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, बांधकाम, रस्ते, उद्योग आणि पर्यटन व लखनौ मेट्रो याविषयी टीका केली होती. त्यांनी केलेली गुजरातची वाहवा म्हणजे सरकार व मुख्यमंत्री यादव यांना लक्ष्य केल्याचा प्रकार असल्याचे सपाने मानले. परिणामी आठवडाभरापासून दबा धरून असलेला हा संघर्ष आता टोकाचा होत आहे. सोमवारी नाईक यांंच्या राज्यपालपदाच्या ९० दिवसांच्या कारकीर्दीवर प्रकाशित झालेल्या खासगी पुस्तिकेचे निमित्त साधून सपाने टीकेचा वार केला आहे. प्रत्यक्षात सपाच्या नाराजीच्या केंद्रस्थानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह ८-१० कार्यकर्त्यांना नाईक यांनी राजभवनात १४ आॅक्टोबरला भोजन दिल्याची घटना आहे. सत्तारूढ समाजवादी पार्टीने ‘राजभवनाचे राजकीयीकरण ’ होत आहे असे सांगून राज्यपालांना खिंडीत पकडले. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी सरकारबाबत नाईक यांनी व्यक्त केलेले मत रास्त असल्याचे सांगून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. काँग्रेस नेत्या रीता बहुगुणा जोशी यांनीही राज्यपालांनी सरकारी कारभारात हस्तक्षेप करू नये, असे म्हटले. या वादावर नाईक यांनी, आपण राज्यघटनेनुसार कामकाज करत असून, सरकार जनतेच्या कामात कसूर करत असेल तसेच कायदा व सुव्यवस्थेत ते अपयशी ठरत असेल तर केंद्र सरकारकडे अहवाल पाठवू असे पत्रपरिषदेत सांगितले.२२ जुलै रोजी नाईकांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा हाती घेतला होता. आग्रा येथे गेल्या आठवड्यात झालेल्या एका भाषणात त्यांनी रात्री अकरा नंतर एकट्या महिलेला घराबाहेर पडतानाही मनात भय नसावे असे सांगून राज्यात कायदा व सुव्यवस्थेत सुधारणेची गरज आहे, अशी टिपणी जोडली. पर्यटन व उद्योगाबाबतही सरकार फारसे गंभीर नाही असे सांगून जगभरातील लोक ताज महाल पाहायला येथे येतात मात्र नियमित विमान वाहतुकीच्या विस्तारासाठी राज्य सरकारने कधी पाठपुरावा केला नाही, अशीही उदाहरणे दिली. त्यानंतर लखनौच्या एका कार्यक्रमात नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते भ्रष्टाचारी झाले आहे. बांधकामाची गुणवत्ता अतिशय वाईट आहे, असा शेरा मारून ताजमहाल व राजभवन या शेकडो वर्षे जुन्या वास्तु दणकट आहेत, मात्र अलीकडे बांधलेल्या राज्यातील इमारती खिळखिळ््या झाल्याचे ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री यादव यांचा महत्वाकांक्षी लखनौ मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही, अशी शंकाही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. यामुळे यादव भडकले आहेत. मेट्रोच्या भूमिपूजनाला कोणत्याच केंद्रीय मंत्र्याला व लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांना निमंत्रित न केल्याचा वचपा नाईक यांनी ही शंका उपस्थित करून काढल्याचा तर्क समाजवादी पार्टीने काढल्याने सध्या उत्तरप्रदेशात ‘नवे प्रश्न’ उभे ठाकले आहेत. भागवत यांच्या भोजनाबाबत नाईक यांनी गेल्या ९० दिवसांत १७०० लोक राजभवनात आल्याचे सांगून मुद्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला.