शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

राजस्थानात गोरक्षकांनी हत्या केल्याच्या आरोपावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 03:54 IST

स्वत:च्या गायी ट्रकमधून घेऊन जाणार्‍या उमर मोहम्मद खान या ३५ वर्षाच्या दुग्धव्यावसायिकास गोरक्षकांच्या जमावाने वाटेत अडवून गोळ्य़ा घालून त्याची हत्या केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या अलवरमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमृतदेह रेल्वेरुळावर इस्पितळाबाहेर समाजाचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कअलवर (राजस्थान) : स्वत:च्या गायी ट्रकमधून घेऊन जाणार्‍या उमर मोहम्मद खान या ३५ वर्षाच्या दुग्धव्यावसायिकास गोरक्षकांच्या जमावाने वाटेत अडवून गोळ्य़ा घालून त्याची हत्या केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या अलवरमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. मृताच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या सामाजातील लोकांनी कथित गोरक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी अलवर जिल्हा रुग्णालयाबाहेर धरणे धरले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.मृत उमर खान मेओ मुस्लिम समाजातील होता. राजस्थान, हरियाणा व उत्तर प्रदेशाच्या काही भागास मिळून मेवात म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात या समाजाची बरीच वस्ती आहे.इस्पितळाबाहेर धरणे धरून बसलेल्या या समाजातील लोकांचा असा आरोप आहे की, उमर खान व ताहीर खान आणि जब्बा या दोघांसह ट्रकमधून गायी घेऊन भरतपूरकडे निघाला असता वाटेत जनावाने त्यांचा ट्रक अडवून गोळीबार केला. त्यात उमर खान ठार झाला. ताहीर खान हाही गोळी लागून जखमी झाला. पण त्याने तेथून पळ काढला व तो हरियाणातील एका गावात खासगी इस्पितळात दाखळ झाला.उमर खानचा मृत्यू रेल्वेखाली चिरडून झाला असे वाटावे यासाठी जमावाने त्याचा मृतदेह रेल्वेरुळांवर नेऊन टाकला व त्यानंतर त्याच्यावरून गाडी गेली, असाही उमर खानच्या कुटुंबियांचा आरोप आहे.पोलिसांनी रेल्वेमार्गावर मिळालेला मृतदेह इस्पितळात आणला. त्यांनी या संदर्भात रविवार संध्याकाळपर्यंत औपचारिक गुन्हा नोंदविला होता. अलवरचे (दक्षिण) सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार या दोन पूर्णपणे वेगळ्य़ा घटना आहेत व त्यांचा विनाकारण एकमेकरांशी संबंध लावला जात आहे.  मृतदेह रामगढ येथे रेल्वेमार्गावर मिळाला. तेथून सुमारे १५ किमी अंतरावर गोविंगढ येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक पिक अप ट्रक मिळाला. त्यात चार जिवंत व एक मेलेली गाय होती.याच अलवर जिल्ह्यात गेल्या एप्रिलमध्ये हरियाणातील पेहलू खान या गुरे व्यापार्‍याची कथित गोरक्षकांनी मारहाण करून हत्या केली होती. आताची घटना ही त्याचीच पुनरावृत्ती आहे, असे धरणे धरून बसलेल्या लोकांचे म्हणणे असून ते या हल्ल्यामागे राकेश नावाची व्यक्ती असल्याचे सांगत आहेत. 

गुन्हा नोंदवा, अन्यथा मृतदेह घेणार नाहीरेल्वेरुळांत सापडलेल्या मृतदेहावरून गाडी गेल्याने तो एवढा छिन्नविच्छिन्न झाला आहे की त्याची ओळख पटणेही कठीण आहे. जयपूरला नेऊन शवविच्छेदन केल्यानंतरच ओळख पटू शकेल व त्याच्या शरीरावार गोळ्यांच्या जखमा आहेत की नाहीत, हेही स्पष्ट होईल.-अनिल बेनिवाल, सहा. पोलीस अधीक्षक, अलवर

ही हत्या विश्‍व हिंदू परिषदेच्या लोकांनी केली आहे. गुन्हा नोंदवून त्यांना अटक केल्याखेरीज आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही व धरणेही सोडणार नाही.     -जमशीद खान, मेओ मुस्लिमांचे नेते