शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे चर्चचे झाले मंदिर

By admin | Updated: August 28, 2014 11:54 IST

अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र या घटनेमुळे अलीगढमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ऑनलाइन लोकमत

अलीगढ, दि. २८ - अलीगढमधील ७२ जणांच्या 'घर वापसी'मुळे एका रात्रीत गावातील चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर झाले आहे. एका हिंदूत्ववादी गटाने चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवले असून चर्चच्या आतमध्ये आता शंकराच्या मूर्तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

अलीगढमधील असरोई गावातील ग्रामस्थांनी १९९५ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या ७२ जणांनी बुधवारी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. याविषयी संघ प्रचारक आणि धर्म जागरण विवादचे प्रमुख खेम चंद्रा म्हणाले, हे धर्मांतर नसून 'घर वापसी' आहे. त्यांनी स्वेच्छेने काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता त्यांना त्यांची चूक समजल्याने त्यांनी पुह्ना हिंदू धर्म स्वीकारला आहे. या ग्रामस्थांनी हिंदू धर्म स्वीकारताच एका हिंदूत्ववादी गटाने गावातील चर्चवरील क्रॉसचे चिन्ह हटवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच चर्चमध्ये आता शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन चर्चचे मंदिरमध्ये रुपांतर करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे अलीगढमध्यी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. 

हिंदू धर्मातील जातपद्धतीला कंटाळून आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण तिथेही आमच्याकडे दुर्लक्षच झाले त्यामुळे आम्ही पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे ग्रामस्थ अनिल गौर यांनी सांगितले. ख्रिश्चन समुदायाचे धार्मिक नेते व वकिल  ओसमोंड चार्ल्स यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'घर वापसी'मागे आम्हाला षडयंत्र वाटत आहे. कधी आम्ही लव्ह जिहाद ऐकतो तर कधी घर वापसी. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहे का ? असा सवालही चार्ल्स यांनी उपस्थित केला आहे.