शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

तेलुगू देसम रालोआतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:55 IST

तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्या पक्षाने लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.

नवी दिल्ली : तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्या पक्षाने लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. काँग्रेस, डावे पक्ष यांच्यासह वायएसआर काँग्रेसने या ठरावाला पाठिंबा दिला असून, दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. मोदी सरकारवरील हा पहिला अविश्वास ठराव आहे.विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पार्टीतर्फे सातत्याने केली जात होती. मोदी सरकारने ती मान्य न केल्याने त्या पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला. त्यानंतर आज पक्षाने रालोेआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. लोकसभेतील तेलगू देसमचे नेते नरसिम्हम म्हणाले की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून, त्यासाठी रालोआतून बाहेर पडत आहोत. आम्ही अविश्वास ठराव दिला आहे.तेलगू देसमने म्हटले की, वायएसआर काँगे्रसचे खा. विजयसाई रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून, दोन्ही पक्षांत आघाडीचे संकेत दिले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या अविश्वास ठरावावर विश्वास नाही. आम्ही स्वत:च अविश्वास ठराव दाखल करीत आहोत. सोमवारपर्यंत आम्हाला ठरावावर ५४ खासदारांच्या सह्या मिळतील.>यांचा पाठिंबा, शिवसेनेचे काय?५३६ सदस्यांच्या लोकसभेत भाजपाकडे २७४ सदस्य आहेत. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान ५० सदस्यांचा पाठिंबा व सह्या आवश्यक आहेत. तेलगू देसमकडे १६ व वायएसआरकडे ९ सदस्य आहेत. याखेरीज राष्ट्रीय जनता दल, सपा, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट, अण्णा द्रमुक तृणमूल काँग्रेस यांचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना सातत्याने मोदी सरकार व भाजपावर टीका करीत असली तरी अविश्वास ठरावाबाबत काय भूमिका घेणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. अनेकांच्या मते शिवसेना ठरावाला थेट पाठिंबा देण्याची शक्यता नाही. कदाचित मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याचा निर्णय शिवसेना घेऊ शकेल.संपूर्ण देशाचा मोदी यांच्यावर व केंद्र सरकारवर विश्वास आहे आणि आमच्याकडे आवश्यक संख्याबळही आहे. या ठरावाचा काहीही उपयोग होणार नाही.- अनंतकुमार, संसदीय कार्यमंत्रीमाकपचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले की, या ठरावाला आमचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पाठिंबा देताना तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस यांनी राजकारण करू नये, असे आवाहन केले.>वायएसआरविषयी तेलगू देसमला शंकावायएसआर काँग्रेसने गुुरुवारीच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्यास पाठिंबा देण्याची घोषणा गुरुवारी करणाऱ्या तेलगू देसमने आज स्वत:ही अविश्वास प्रस्ताव सादर केला. वायएसआर व भाजपा यांची हातमिळवणी असल्याचा तेलगू देसमला संशय आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू