शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:08 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते उद्घाटन, २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली.

हैदराबाद - ‘लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण सरकारी यंत्रणेने भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या आदर्शांना साकार करण्यासाठी काम करावे, या उद्देशाने तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येथे रविवारी सांगितले. २६५ फूट उंच आणि २८ एकर जागेत १०,५१,६७६ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन सचिवालय संकुलाचे उद्घाटन राव यांनी केले. 

तेलंगणा आंदोलनादरम्यान आलेल्या अनेक अडचणींचा तसेच नवे सचिवालय बांधताना झालेल्या विरोधाचा उल्लेखही मुख्यमंत्री राव यांनी यावेळी केला. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून राज्य सचिवालय बांधले आणि ते देशातील सर्वोत्कृष्ट सचिवालयांपैकी एक असल्याचेही राव म्हणाले. 

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली. तेलंगणा राज्य हे देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक शक्ती बनले आहे. राज्यातील सर्व जलसाठे पुनरुज्जीवित झाले असून भर उन्हाळ्यातही तलाव पाण्याने भरलेले आहेत. याला म्हणतात राज्याची पुनर्रचना आणि सर्व राजकीय विरोधकांनी डोळे उघडून राज्यातील हा विकास पहावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

आज तेलंगणात जगातील सर्वात मोठा कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प बांधला आहे, जो अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. धरणांमुळे जलस्रोत पुनर्संचयित करण्यास मदत झाली आहे. देशातील ८४ लाख एकर भातशेतीपैकी एकट्या तेलंगणात  ५६ लाख एकर क्षेत्रात लागवड झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

तेलंगणात २४ तास वीजआज तेलंगणात विजेचे संकट नाही. चोवीस तास सर्व क्षेत्रांना पुरवठा केला जातो. शेतकरी स्वाभिमानाने जगत आहेत आणि हा तेलंगणाच्या पुनर्रचनेचा परिणाम आहे. गावे आणि शहरांची वाढ अभूतपूर्व आहे. तेलंगणाने केंद्र शासनातर्फे दिले जाणारे विक्रमी पंचायत पुरस्कार पटकावले आहेत, असे राव म्हणाले.

टॅग्स :Telanganaतेलंगणा