शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

Telangana Rape Case: ''संसद जसा पाहिजे तसा कायदा बनवण्यासाठी तयार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:54 IST

तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.

नवी दिल्लीः तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे. संसद जसा पाहिजे, तशा कायद्यावर सहमती बनवू शकते, तसेच तो कायदा तयारही केला जाऊ शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रकरणात चर्चा करण्यात येईल. त्यासाठी कायदा बदलण्याची गरज नाही. तर या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, संसदेला आवश्यक वाटल्यास तसा कठोर कायदाही बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभेत चर्चेदरम्यान अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं की, हैदराबादमधल्या घटनेत पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्या पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही चौकशी समिती नेमायला तीन दिवस लागले. जेव्हा केव्हा अशी घटना घडते, तेव्हा आपण सदनात चर्चा करतो. अशा घटनेचा निषेध नोंदवून कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. परंतु अशा काही घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला सातत्यानं अपयश येत आहे. डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. राज्यसभेतही या प्रकरणात चर्चा झालेली आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 'अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे' असं देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह