शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

Telangana Rape Case: ''संसद जसा पाहिजे तसा कायदा बनवण्यासाठी तयार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:54 IST

तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.

नवी दिल्लीः तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे. संसद जसा पाहिजे, तशा कायद्यावर सहमती बनवू शकते, तसेच तो कायदा तयारही केला जाऊ शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रकरणात चर्चा करण्यात येईल. त्यासाठी कायदा बदलण्याची गरज नाही. तर या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, संसदेला आवश्यक वाटल्यास तसा कठोर कायदाही बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभेत चर्चेदरम्यान अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं की, हैदराबादमधल्या घटनेत पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्या पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही चौकशी समिती नेमायला तीन दिवस लागले. जेव्हा केव्हा अशी घटना घडते, तेव्हा आपण सदनात चर्चा करतो. अशा घटनेचा निषेध नोंदवून कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. परंतु अशा काही घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला सातत्यानं अपयश येत आहे. डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. राज्यसभेतही या प्रकरणात चर्चा झालेली आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 'अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे' असं देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह