शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

७२ तासांत राजीनामा द्या, तेजस्वींना अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:03 IST

बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला असून, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी ७२ तासांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा अल्टिमेटम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी दिला

पाटणा : बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला असून, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी ७२ तासांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा अल्टिमेटम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी दिला. येत्या शुक्रवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, तत्पूर्वी तेजस्वींनी राजीनामा न दिल्यास नितीशकुमार त्यांना पदावरून बरखास्त करू शकतात, असे संकेत मिळत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे कोणत्याही स्थितीत आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नाहीत. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात लालू व त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते.त्यामुळे नितीशकुमार यांनी तेजस्वींना मंत्रिमंडळातून पायउतार होण्यास सांगितले आहे.प्राप्त स्थितीवर विचार करण्यासाठी लालूंनी पक्षाची बैठक बोलावली आहे. तेजस्वींनी सध्या राजीनामा देणेच योग्य राहील. त्यामुळे राजकीय विरोधकांची धारही कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे संकेत मिळत आहेत.२८ वर्षीय तेजस्वी यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मागील आठवड्यात नितीशकुमारांची भेटही घेतली होती; परंतु त्याने मुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही.विशेष म्हणजे लालूंच्या आमदारांची संख्या नितीशकुमारांच्या आमदारांच्या संख्येपेक्षा जास्त असूनही तेजस्वींनी राजीनामा दिल्यास सरकारला धोका नाही, असे नितीशकुमार सांगत आहेत.२४३ आमदारांच्या बिहार विधानसभेत सत्ताधारी आघाडीत राजदचे ८०, जदयूचे ७१, तर काँग्रेसचे २७ सदस्य आहेत. विरोधकांत भाजप ५३, लोजप २, आरएलएसपी २, एचएएम १, माकपा (एमएल) ३, अपक्ष ४ आहेत. राज्यातील आघाडीचे काही बरेवाईट झाल्यास बदलती स्थिती लक्षात घेऊन लालूप्रसाद यादव हे मायावतींशी हातमिळवणी करण्याचे संकेत आहेत. तसेच जदयू व भाजप एकत्र येण्याचीही चर्चा आहे. नोटाबंदी, राष्टÑपती निवडणुकीच्या निमित्ताने नितीशकुमार हे रालोआच्या जवळ गेल्याचे मानले जाते. यामुळे राज्यातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.