शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 12:40 IST

कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं.

ठळक मुद्देकसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते.

कॅन्डी, दि. 15 - कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. बीसीसीआयने ध्वजारोहणाचा व्हिडीओ जारी केला आहे. 

एक दिवसापूर्वीच टीम इंडियाने 85 वर्षांनंतर पहिल्यांदा विदेशी धरतीवर व्हाइटवॉश देऊन भारतीयांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं होतं. पल्लेकल कसोटीत  श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला. 

विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेत रचला इतिहास-विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.   विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने 2000मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने, तर 2004 व 2010 मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.सलग मालिका विजयाच्या वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर-भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग 9 मालिका विजय मिळवले होते. यापूर्वी भारताने 2008 आणि 2010 च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली 5 सलग विजय मिळवले होते.  टेस्ट क्रिकेटमध्ये सलग मालिका विजयात कोण पुढे- -ऑस्ट्रेलिया -9 (2005/06-2008) -भारत- 8 (2015- 2017) -इंग्लंड -8 (1884-1892) -ऑस्ट्रेलिया -7 (1945/46-1951/52) -ऑस्ट्रेलिया -7 (1956/57-1961) -वेस्टइंडीज-7 (1982/83-1985/86) -ऑस्ट्रेलिया- 7 (2001/02-2003/04) 

आणखी वाचाIndependence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिनस्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसVirat Kohliविराट कोहली