शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 12:40 IST

कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं.

ठळक मुद्देकसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते.

कॅन्डी, दि. 15 - कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. बीसीसीआयने ध्वजारोहणाचा व्हिडीओ जारी केला आहे. 

एक दिवसापूर्वीच टीम इंडियाने 85 वर्षांनंतर पहिल्यांदा विदेशी धरतीवर व्हाइटवॉश देऊन भारतीयांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं होतं. पल्लेकल कसोटीत  श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला. 

विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेत रचला इतिहास-विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.   विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने 2000मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने, तर 2004 व 2010 मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.सलग मालिका विजयाच्या वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर-भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग 9 मालिका विजय मिळवले होते. यापूर्वी भारताने 2008 आणि 2010 च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली 5 सलग विजय मिळवले होते.  टेस्ट क्रिकेटमध्ये सलग मालिका विजयात कोण पुढे- -ऑस्ट्रेलिया -9 (2005/06-2008) -भारत- 8 (2015- 2017) -इंग्लंड -8 (1884-1892) -ऑस्ट्रेलिया -7 (1945/46-1951/52) -ऑस्ट्रेलिया -7 (1956/57-1961) -वेस्टइंडीज-7 (1982/83-1985/86) -ऑस्ट्रेलिया- 7 (2001/02-2003/04) 

आणखी वाचाIndependence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिनस्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसVirat Kohliविराट कोहली