शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तावडेंनी दहावीला डमी बसविल नवाब मलिक यांचा आरोप: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:57 IST

मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालप˜ी करा, अशी मागणीही केली आहे.

मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालप˜ी करा, अशी मागणीही केली आहे.
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले,बोगस पदवी असणार्‍या शिक्षणमंत्र्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासारखी महत्वाची खाती आहेत. त्यामुळे या शिक्षणमंत्र्याच्या बोगसगिरीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होण्याची भीती वाटत आहे. ते म्हणाले, तावडे हे कोणतीही कायदेशीर मान्यता नसणार्‍या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगत आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे १२ वी फेल विद्यार्थांना इंजिनिअरच्या पदव्याचे वाटप करणारे विद्यापीठ होते. या विद्यापीठातूनच तावडे यांनी बोगस पदवी घेतली असून ते बारावी नापास आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.
तावडेंचे बोगस पदवीचे प्रकरण उघड होऊन देखील ते आपल्या फेसबुक पेज तसेच संबधीत संकेतस्थळावरील माहितीत ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाल्याचे दाखवत आहेत. विनोद तावडेंनी आता जनतेची ही फसवणूक बंद केली पाहिजे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
........................
मलिक यांनी आरोप सिध्द करावे- तावडे
दहावीच्या परिक्षेत डमी उमेदवार बसवून पास झाल्याचे आणि बारावी च्या परीक्षेत मी नापास झाल्याचे नवाब मलिक यांनी सिध्द केले, तर मी राजकारण सोडून देईन, पण त्यांनी केलेला दावा जर ते सिध्द करु शकले नाहीत तर त्यांनी राजकारण सोडावे असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले आहे.