शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तावडेंनी दहावीला डमी बसविल नवाब मलिक यांचा आरोप: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:57 IST

मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालप˜ी करा, अशी मागणीही केली आहे.

मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालप˜ी करा, अशी मागणीही केली आहे.
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले,बोगस पदवी असणार्‍या शिक्षणमंत्र्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासारखी महत्वाची खाती आहेत. त्यामुळे या शिक्षणमंत्र्याच्या बोगसगिरीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होण्याची भीती वाटत आहे. ते म्हणाले, तावडे हे कोणतीही कायदेशीर मान्यता नसणार्‍या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगत आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे १२ वी फेल विद्यार्थांना इंजिनिअरच्या पदव्याचे वाटप करणारे विद्यापीठ होते. या विद्यापीठातूनच तावडे यांनी बोगस पदवी घेतली असून ते बारावी नापास आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.
तावडेंचे बोगस पदवीचे प्रकरण उघड होऊन देखील ते आपल्या फेसबुक पेज तसेच संबधीत संकेतस्थळावरील माहितीत ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाल्याचे दाखवत आहेत. विनोद तावडेंनी आता जनतेची ही फसवणूक बंद केली पाहिजे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
........................
मलिक यांनी आरोप सिध्द करावे- तावडे
दहावीच्या परिक्षेत डमी उमेदवार बसवून पास झाल्याचे आणि बारावी च्या परीक्षेत मी नापास झाल्याचे नवाब मलिक यांनी सिध्द केले, तर मी राजकारण सोडून देईन, पण त्यांनी केलेला दावा जर ते सिध्द करु शकले नाहीत तर त्यांनी राजकारण सोडावे असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले आहे.