शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

टाटा VS मिस्त्री लढा सुरूच राहणार

By admin | Updated: February 8, 2017 02:14 IST

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले असले तरी मिस्त्री यांचा टाटांच्या विरोधातील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.टाटा सन्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत काल मिस्त्री यांना संचालक पदावरून दूर करण्यात आले. एंजल स्टॉक ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे प्रमुख वैभव अग्रवाल यांनी सांगितले की, मिस्त्री यांना संचालकपदावरून दूर करून टाटा उद्योग समूहाने याबाबतची अनिश्चितता संपविली आहे. आता कंपनी केवळ व्यवसायाकडे लक्ष देऊ शकेल. मात्र दोन्ही बाजूंचा कायदेशीर लढा सुरूच राहील असे दिसते. टीसीएसचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांची याआधीच टाटा सन्सच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ते २१ फेब्रुवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. याशिवाय कंपनीने संचालकपदाची जागा रिक्त ठेवलेली नाही.आपला लढा कायदेशीर व्यासपीठावर घेऊन जात आहोत, असे मिस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले होते. गुंतवणूक सल्लागार एस. पी. तुलसीयन यांनी सांगितले की, ही लढाई दीर्घकाळ चालेल. हा खटला कंपनी लवादातून उच्च न्यायालयात व तेथून सर्वोच्च न्यायालयात जाईल.टाटा सन्सची विशेष सर्वसाधारण सभा रोखण्यासाठी सायरस मिस्त्री यांच्या गुंतवणूक संस्थांनी राष्ट्रीय कंपनी लवादासमोर याचिका दाखल केल्या होत्या. त्या लवादाने शुक्रवारी फेटाळून लावल्या होत्या. टाटांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी लवादासमोर सांगितले होते की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा होऊ द्यावी. संचालकाची एक जागा ३0 दिवसांपर्यंत रिक्त ठेवली जाईल. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हाकलल्यानंतर शापूरजी पालनजी कुटुंबाचा कोणीही प्रतिनिधी टाटाच्या संचालक मंडळात नाही. कित्येक दशकांत पहिल्यांदाच असे घडत आहे. मिस्त्री यांचे वडील पालनजी शापूरजी मिस्त्री हे १९८0 ते २00४ या काळात संचालक मंडळावर होते. सायरस मिस्त्री २00६मध्ये संचालक मंडळावर आले. टाटामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाची १९६५पासून मोठी हिस्सेदारी आहे.