शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

टाटा समूहाला 1 लाख 18 हजार कोटींचा तोटा सोसावा लागेल - सायरस मिस्त्री

By admin | Updated: October 26, 2016 18:53 IST

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन तडकाफडकी हटवण्याच्या निर्णयावर सायरस मिस्त्री यांनी टीका केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - नफ्यात नसलेल्या उद्योगांमध्ये टाटा समूहातील कंपन्यांची मोठया प्रमाणावर गुंतवणूक आहे त्यामुळे १ लाख १८ हजार कोटींवर पाणी सोडावे लागू शकते असे सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळातील सदस्यांना पाठवलेल्या कथित पत्रात म्हटले आहे. हे पत्र फुटले असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 
 
टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन तडकाफडकी हटवण्याच्या निर्णयावर सायरस मिस्त्री यांनी टीका केली आहे. संचालक मंडळातील सदस्य आणि ट्रस्टला पाठवलेल्या ईमेलमध्ये मिस्त्री यांनी बोर्डाच्या निर्णयाने आपल्याला धक्का बसला तसेच बोर्डाचा निर्णय बेकायद असल्याचे म्हटले आहे. आपण चेअरमनपदावर असताना रतन टाटा यांच्याकडून सातत्याने हस्तक्षेप सुरु होता असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.
 
आपण समूहाची सूत्रे स्वीकारल्यानंतर  टाटा सन्सची जी कलमे त्यात बदल करण्यात आला त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही. या बदलांमुळे चेअरमनकडे असणारे अधिकार कमी झाले असा आरोप मिस्त्री यांनी केला आहे. चेअरमनला आपली बाजू मांडू न देता तुम्ही पदावरुन हटवले. कॉर्पोरेट इतिहासातील हा असा एकमेव निर्णय असेल. 
 
कुठलेही स्पष्टीकरण न देता तडकाफडकी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे माझे आणि समूहाच्या प्रतिमेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे असे मिस्त्री यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. कॉर्पोरेट रणनिती नसल्याच्या आरोपावरही मिस्त्री यांनी उत्तर दिले आहे. टाटा सन्सच्या बोर्डाच्या बैठकीत आपण २०२५ पर्यंतचा समूहासाठीचा प्लॅन  सादर केला होती असे मिस्त्री यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. 
 
२०११-१२ च्या सुमारास टाटा समूहासाठी नव्या चेअरमनचा शोध सुरु होता त्यावेळी स्वत: रतन टाटा आणि लॉर्ड भट्टाचार्य यांनी माझ्याशी संपर्क साधून मला चेअरमनपदासाठी उमेदवार बनण्याची विनंती केली होती. पण मी त्यावेळी नकार दिला. मी स्वत:चा बिझनेस उभा केल्याने तो पुढे नेण्यामध्ये मला जास्त रस  होता. पण ज्यावेळी निवड समितीला चेअरमनपदासाठी योग्य उमेदवार सापडला नाही. त्यावेळी मला पुन्हा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी मी कुटुंबाशी चर्चा करुन टाटा समूहाचे हित डोळयासमोर ठेऊन चेअरमनपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 
 
नियुक्तीपूर्वी मला निर्णय स्वातंत्र्य देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर टाटा समूहाचे कलम, नियम यामध्ये बदल करण्यात आले त्यामुळे पूर्ण निर्णय स्वातंत्र्य मिळाले नाही असा मिस्त्री यांचे म्हणणे आहे.