शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

असहिष्णुतेवरुन आमिरला टार्गेट करा, भाजपानेच दिला होता आदेश

By admin | Updated: December 29, 2016 13:07 IST

असहिष्णुतेवरुन केलेल्या वक्तव्यावर आमिर खानला टार्गेट करत स्नॅपडीलला त्याला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवण्यास भागा पाडा असा आदेश भाजपाकडून देण्यात आला होता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - असहिष्णुतेवरुन केलेल्या वक्तव्यावर आमिर खानला टार्गेट करत स्नॅपडीलला त्याला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवण्यास भागा पाडा असा आदेश भाजपाकडून देण्यात आला होता. हा धक्कादायक खुलासा भाजपाच्या माजी सोशल मिडिया स्वयंसेवक साध्वी खोसला यांनी केला आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या 'I am a Troll' या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. एखाद्यावर दबाव आणण्यासाठी पक्षाकडून अनेक मुद्यांवर ट्रोल करण्यास सांगण्यात येत असे, यामध्ये आमिर खानच्या असहिष्णुता वक्तव्याचाही समावेश होता. आमीर खानचं ते वक्तव्य सरकारवर टीका म्हणून पाहिलं गेलं होतं. 
 
(वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडण्याबद्दल सुचवले होते - आमिर खान)
(भारतात 2015 मध्ये वाढली असहिष्णुता, USCIRFचा अहवाल)
 
पक्षाकडून वारंवार मिळणा-या या अशा प्रकारच्या आदेशांमुळे अस्वस्थ झालेल्या साध्वी खोसला यांनी 2015 मध्ये भाजपाच्या मिडिया सेलमधून राजीनामा दिला होता. 'हा न संपणारा द्वेष आणि हटवाद होता. यामध्ये अल्पसंख्यांक, गांधी कुटुंब, पत्रकार, उदारमतवादी सोबतच जे कोणी मोदींविरोधात असेल त्यांना टार्गेट केलं जात होतं,' असं साध्वी खोसला यांनी सांगितलं आहे. साध्वी यांनी आपल्याला व्हाट्सअॅपवर मिळालेले मेसेजही शेअर केले आहेत. हे असले आदेश हजारो स्वयंसेवकांना गेले होते. साध्वी यांच्या म्हणण्यानुसार भाजपाच्या आयटी सेलची कोअर टीम स्वयंसेवकांचे किमान 20 व्हाट्सअॅप ग्रुप सांभाळते ज्यामध्ये वय आणि कामानुसार विभाजन करण्यात आले आहे. 
 
आमिर खानला टार्गेट करण्याचा आदेश भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांच्याकडून आल्याचं साध्वीने सांगितलं असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. एका आदेशात स्नॅपडीलने आमिर खानला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवावं अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका सुरु करण्यास सांगण्यात आलं होतं. 
 
(ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी भारत हा अतुल्यच राहणार - आमिर खान) 
 
साध्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकारणी हिट लिस्टवर होते. यामध्ये पत्रकार बरखा दत्त आणि राजदीप सरदेसाई यांचाही समावेश होता. अनेकदा ट्रोल करताना नाव गुपित ठेवलं जायचं. अनेकदा तर लैंगिक हिंसा करण्याचीही धमकी दिली जात असल्याचंही साध्वी यांनी सांगितलं आहे. 
 
'महिला पत्रकारांनाही जेव्हा बलात्काराची धमकी दिल्या गेल्या तेव्हा मात्र माझ्या संयमाचा बांध तुटला. मी डोळे झाकून त्यांना फॉलो करु शकत नव्हते. रोज एका नवीन व्यक्तीला टार्गेट केलं जात असेल, यामुळे माझा श्वास गुदमरत होता', असं साध्वी यांनी पुस्तकातून सांगितलं आहे. 
 
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांच्याकडे जेव्हा या आरोपांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा 'साध्वी खोसला काँग्रेसला समर्थन देतात, असले आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असल्याचं', बोलले आहेत. भाजपाने कधीच ट्रोलिंगला पाठिंबा दिलेला नाही असा दावाही त्यांनी केला आहे. तसंच 2015 ला पक्षाची नव्याने बांधणी करण्यात आली तेव्हापासून मी सोशल मिडिया सांभाळत नसल्याचंही ते बोलले आहेत.