शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

तामिळनाडूत 'रात्रीस खेळ चाले', पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी?

By admin | Updated: February 8, 2017 09:03 IST

पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 08 - अण्णाद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. रात्री उशिरा झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललितांच्या पक्षात शशिकला व पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून आले. सोमवारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काल रात्री पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं', असा आरोप केला. तसंच जनतेने आणि पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले. पन्नीरसेल्वम यांच्या दाव्यानंतर शशिकलांनी लगेच पोएस गार्डनस्थित निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर शशिकला यांनी पक्षाच्या खजिनदार पदावरुन पनीरसेल्वम यांना हटवत त्यांच्याजागी डिंडीगुल श्रीनिवासन यांच्याकडे खजिनदार पद सोपवले आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार पनीरसेल्वम यांनी पक्षाविरोधातील बंड थांबवावे अन्यथा त्यांना पक्षातून निलंबित करण्याच येईल असा इशारा शशिकला यांनी दिला आहे. या बैठकीत अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसह बहुतांशी आमदार उपस्थित होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास शशिकला यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पनीरसेल्वम यांच्यावर निशाणा साधला. पक्षातील आमदारांमध्ये एकजूट असून पनीरसेल्वम यांना पक्षात ठेवता कामा नये अशी आमदारांनी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितलेमी अण्णा द्रमुक पक्षाचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे प्रतीक्षा करा आणि उद्या काय होईल ते पाहा असे विधान पनीरसेल्वम यांनी रात्री उशीरा केले आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्या हलचालीकडे सर्वच देशाचे लक्ष लागले आहे. काल रात्री तामिळनाडूच्या राजकीकारणात विविध घटना घडल्या अण्णा द्रमुक पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही मायत्रेयन यांनी ओ. पनीरसेल्वम यांच्यानिवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी पनीरसेल्वम यांच्यावर दबाब आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे अवाहन केले आहे. काल रात्री पक्ष कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना कुठलीही माहिती न देता पन्नीरसेल्वम अचानक चेन्नईच्या मरीना बीचवरील एमजीआर मेमोरिअल येथे जयललिता यांच्या स्मारकासमोर जाऊन आत्मचिंतनाला बसले. ते किमान ४० मिनिटं डोळे मिटून बसले होते. त्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना त्यांनी पक्षातील नेत्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितल्याने हा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट केला. मला मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मात्र, नेहमी अपमानजनक वागणूक मिळत होती, असा खुलासाही यावेळी पन्निरसेल्वम यांनी केला.३३ वर्षे एखाद्या बरोबर राहणे ही मुख्यमंत्रिपदाची पात्रता ठरत नाही, अशी टीका जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी केली आहे. तसेच जयललिता यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.