शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

तामिळनाडूत 'रात्रीस खेळ चाले', पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी?

By admin | Updated: February 8, 2017 09:03 IST

पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 08 - अण्णाद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. रात्री उशिरा झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललितांच्या पक्षात शशिकला व पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून आले. सोमवारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काल रात्री पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं', असा आरोप केला. तसंच जनतेने आणि पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ, असंही जाहीर केले, त्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप आल्याचे दिसून आले. पन्नीरसेल्वम यांच्या दाव्यानंतर शशिकलांनी लगेच पोएस गार्डनस्थित निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर शशिकला यांनी पक्षाच्या खजिनदार पदावरुन पनीरसेल्वम यांना हटवत त्यांच्याजागी डिंडीगुल श्रीनिवासन यांच्याकडे खजिनदार पद सोपवले आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार पनीरसेल्वम यांनी पक्षाविरोधातील बंड थांबवावे अन्यथा त्यांना पक्षातून निलंबित करण्याच येईल असा इशारा शशिकला यांनी दिला आहे. या बैठकीत अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसह बहुतांशी आमदार उपस्थित होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास शशिकला यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पनीरसेल्वम यांच्यावर निशाणा साधला. पक्षातील आमदारांमध्ये एकजूट असून पनीरसेल्वम यांना पक्षात ठेवता कामा नये अशी आमदारांनी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितलेमी अण्णा द्रमुक पक्षाचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे प्रतीक्षा करा आणि उद्या काय होईल ते पाहा असे विधान पनीरसेल्वम यांनी रात्री उशीरा केले आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्या हलचालीकडे सर्वच देशाचे लक्ष लागले आहे. काल रात्री तामिळनाडूच्या राजकीकारणात विविध घटना घडल्या अण्णा द्रमुक पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही मायत्रेयन यांनी ओ. पनीरसेल्वम यांच्यानिवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी पनीरसेल्वम यांच्यावर दबाब आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे अवाहन केले आहे. काल रात्री पक्ष कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना कुठलीही माहिती न देता पन्नीरसेल्वम अचानक चेन्नईच्या मरीना बीचवरील एमजीआर मेमोरिअल येथे जयललिता यांच्या स्मारकासमोर जाऊन आत्मचिंतनाला बसले. ते किमान ४० मिनिटं डोळे मिटून बसले होते. त्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना त्यांनी पक्षातील नेत्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितल्याने हा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट केला. मला मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मात्र, नेहमी अपमानजनक वागणूक मिळत होती, असा खुलासाही यावेळी पन्निरसेल्वम यांनी केला.३३ वर्षे एखाद्या बरोबर राहणे ही मुख्यमंत्रिपदाची पात्रता ठरत नाही, अशी टीका जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी केली आहे. तसेच जयललिता यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.