शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मंदिरात महिलेला जेवणापासून रोखलं; मंत्र्यांना कळताच सोबत बसवून सन्मानित केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:31 IST

ही महिला अनुसुचित जातीतील असल्याने महिलेसोबत अशी वर्तवणूक केल्याची चर्चा सर्वत्र पसरली. महिलेने मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप लावले.

चेन्नई - महिलांना मंदिर प्रवेश आणि अन्य कारणावरुन दक्षिणेकडे कायम वादंग सुरु असतो. पूर्वापार चालत असलेल्या रुढी परंपरांबाबत आता हळूहळू समाजात जागरुकता निर्माण होत आहे. आधीच्या काळात लोकं एकमेकांकडे जातीच्या नजरेने पाहायचे. क्षुद्र लोकांना समाजातील मान्यवर आसपासही फिरकून द्यायचे नाहीत. मात्र आधुनिक भारतात आजही अनेकठिकाणी जाती व्यवस्थेचा समाजावर किती पगडा आहे ते दिसून येते. कनिष्ठ जातीतील लोकांना हीन वागणूक देत त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते.

अलीकडेच तामिळनाडूतील ममल्लापुरम येथे राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी स्वत:ला आणि कुटुंबीयांना कांचीपूरमच्या मंदिरात अन्नदान कार्यक्रमावेळी अपमानित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या महिलेला मंदिरात जेवणापासून रोखण्यात आले. इतकचं नाही तर महिलेला मारहाण झाली कारण ती नरिकुराव समुदायातून होती.

अनुसुचित जातीच्या महिलेला मंदिरात जेवण दिलं नाही

महिलेचा आरोप होता की, मी माझ्या कुटुंबीयांसह मंदिरात गेली होती. तेव्हा मला सगळ्यात शेवटी बसवण्यात आले. जेवण वाढण्यापूर्वी मंदिराचे काही कार्यकर्ते आले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. या महिलेने कार्यकर्त्यांना विरोध केल्यावर महिलेला मारहाण करण्यात आली. ही महिला अनुसुचित जातीतील असल्याने महिलेसोबत अशी वर्तवणूक केल्याची चर्चा सर्वत्र पसरली. महिलेने मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप लावले.

मंत्र्याने महिलेसोबत केले भोजन

राज्यभरात ही बातमी सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखी पसरली तेव्हा तातडीने मंत्र्याने याची दखल घेतली. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मंदिर प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली होती. तामिळनाडूतील मंत्री पी के शेखर बाबू यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या महिलेला आणि अन्य लोकांना अधिकाऱ्यांसह मंदिरात अन्नदान कार्यक्रमावेळी बोलावलं. त्यानंतर महिलेसोबत नारिकुराव जातीच्या अन्य लोकांना बरोबर घेऊन मंत्र्याने मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांना खरडपट्टी काढत महिलेसोबत जेवण केले. सर्व लोकांना एकसमान वागणूक दिली पाहिजे. सर्वांचा आदर राखला पाहिजे असा संदेश मंत्र्यांनी त्यांच्या कृतीतून जनतेला दाखवून दिला.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू