शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

तामिळी तिढा कायम

By admin | Updated: February 9, 2017 02:37 IST

व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले

चेन्नई : व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले असून, ‘माझी शक्ती विधानसभेतच कळेल,’ असा दावाही केला. त्यांच्या बंडामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी चेन्नईत जाण्याचे टाळले. परिणामी शशिकला यांच्या शपथविधीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. राव चेन्नईला कधी जाणार, हे माहीत नाही, असे मुंबईतील राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शशिकला यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेल्या निवडीला निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्याकडून तसेच पक्षाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाने समाधान होईपर्यंत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र १३0 पैकी एकही आमदार फुटू नये, म्हणून त्या सर्वांना एका हॉटेलात डांबण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूतील घटनांशी सरकार व भाजपा यांचा संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या आमदारांची बुधवारी तातडीची बैठक बोलावली. त्यास १३0 आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. शशिकला यांच्यासमवेत अधिक आमदार असले तरी कार्यकर्ते आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यात पनीरसेल्वम यशस्वी ठरले असून, त्यांच्यावर अन्याय झाला, अशीच भावना व्यक्त होत आहे. शशिकला यांच्यापुढे हीच मोठी अडचण आहे. पनीरसेल्वम यांच्यासोबत दोन आमदार, माजी विधानसभाध्यक्ष पांडियन व खा. मैत्रेयन उपस्थित होते. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि खासदार शशिकला पुष्पा यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे - शशिकलापनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, असे शशिकला यांनी ठरविले असून, त्यांनी सर्व जिल्हा सचिवांना चेन्नईत बोलावून घेतले आहे. अण्णा द्रमुकमध्ये पक्षाच्या जिल्हा सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे बनले असून, करुणानिधी व स्टॅलिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी मुख्यमंत्रिपद न सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शशिकला यांनी केला. त्या म्हणाल्या की, पनीरसेल्वम यांच्या धमक्यांपुढे पक्ष कदापि गुडघे टेकणार नाही. पनीरसेल्वम यांनी मात्र द्रमुकशी हातमिळवणीच्या आरोपाचे खंडन केले. राजीनाम्यासाठी माझा छळ करण्यात आला, असेही ते म्हणाले.