शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

तामिळी तिढा कायम

By admin | Updated: February 9, 2017 02:37 IST

व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले

चेन्नई : व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले असून, ‘माझी शक्ती विधानसभेतच कळेल,’ असा दावाही केला. त्यांच्या बंडामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी चेन्नईत जाण्याचे टाळले. परिणामी शशिकला यांच्या शपथविधीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. राव चेन्नईला कधी जाणार, हे माहीत नाही, असे मुंबईतील राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शशिकला यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेल्या निवडीला निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्याकडून तसेच पक्षाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाने समाधान होईपर्यंत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र १३0 पैकी एकही आमदार फुटू नये, म्हणून त्या सर्वांना एका हॉटेलात डांबण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूतील घटनांशी सरकार व भाजपा यांचा संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या आमदारांची बुधवारी तातडीची बैठक बोलावली. त्यास १३0 आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. शशिकला यांच्यासमवेत अधिक आमदार असले तरी कार्यकर्ते आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यात पनीरसेल्वम यशस्वी ठरले असून, त्यांच्यावर अन्याय झाला, अशीच भावना व्यक्त होत आहे. शशिकला यांच्यापुढे हीच मोठी अडचण आहे. पनीरसेल्वम यांच्यासोबत दोन आमदार, माजी विधानसभाध्यक्ष पांडियन व खा. मैत्रेयन उपस्थित होते. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि खासदार शशिकला पुष्पा यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे - शशिकलापनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, असे शशिकला यांनी ठरविले असून, त्यांनी सर्व जिल्हा सचिवांना चेन्नईत बोलावून घेतले आहे. अण्णा द्रमुकमध्ये पक्षाच्या जिल्हा सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे बनले असून, करुणानिधी व स्टॅलिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी मुख्यमंत्रिपद न सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शशिकला यांनी केला. त्या म्हणाल्या की, पनीरसेल्वम यांच्या धमक्यांपुढे पक्ष कदापि गुडघे टेकणार नाही. पनीरसेल्वम यांनी मात्र द्रमुकशी हातमिळवणीच्या आरोपाचे खंडन केले. राजीनाम्यासाठी माझा छळ करण्यात आला, असेही ते म्हणाले.