शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

तामिळनाडूचं नेतृत्व करण्यासाठी तामिळ व्यक्ती का हवा ? - कमल हसन

By admin | Updated: May 27, 2017 14:04 IST

तामिळनाडूचं नेतृत्व करण्यासाठी तामिळ व्यक्ती का हवा ? असं अभिनेते कमल हसन म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27- तामिळनाडूचं नेतृत्व करण्यासाठी तामिळ व्यक्ती का हवा ? असं अभिनेते कमल हसन म्हणाले आहेत. तामिळनाडूचं नेतृत्व तमिळ व्यक्तीने करावं का? असा प्रश्न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्ती आपल्याकडे नेते होऊन गेले आहेत, ते तामिळीयन होते का ? त्यांना लोकांनी स्विकारलं नाही का ? असं उत्तर त्यांनी दिलं आहे. दक्षिणेतील लोक अजूनसुद्धा या नेत्यांची नाव आपल्या मुलांना देतात", असही कमल हसन म्हणाले आहेत.  नुकत्याच झालेल्या तामिळ बीग बॉसच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते.
तामिळ बीग बॉसचं कमल  हसन सूत्रसंचलन करणार आहेत. 
अभिनेते रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरही कमल हसन यांनी उत्तर दिलं आहे. रजनीकांत काही चुकीचं किंवा नविन बोलले नाहीत, असं कमल हसन म्हणाले आहेत.   "कुठलाही साधारण व्यक्ती राजकारणात येण्याचा कधीच विचार करणार नाही, राजकारण हे पैसा कमविण्याचं माध्यम नाही आहे, हे लोकांना कळायला हवं. तामिळनाडूच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता कुठल्याही सामान्य माणसाने किंवा कलाकाराने राजकारणात उडी घेण्याचा विचार करू नये",अशी प्रतिक्रिया कमल हसन यांनी दिली आहे.
तुम्ही राजकारणात जाणार का असा प्रश्न कमल हसन यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर, "वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा मतदान केलं तेव्हाच राजकारणात प्रवेश केला होता. पण कोणी सत्तेत यावं किंवा येऊ नये, यासाठी कधीच वाद घातला नाही". . असं उत्तर कमल हसन यांनी दिलं आहे.