शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तामिळनाडूमध्ये संघाची सत्ता येऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:34 IST

राहुल गांधी; स्टॅलिन लवकरच मुख्यमंत्री

कृष्णगिरी : तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे रा. स्व. संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असाही विश्वास त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली व ते विदेशात पळून गेले. या कर्जबुडव्यांपैकी एकही जण अद्याप तुरुंगात गेलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्ज न फेडता आलेल्या एकाही शेतकऱ्याला आम्ही तुरुंगात धाडणार नाही. कर्जबुडव्या श्रीमंत लोकांवर काहीही कारवाई होत नाही, पण त्याच गुन्ह्यापायी गरीब शेतकऱ्यांना शिक्षा सुनावली जाते हे अयोग्य आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसीला प्रत्येकी ३५ हजार कोटी रुपये व विजय मल्ल्याला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदींनी आपल्या १५ मित्रांसाठीच सरकार चालविले त्या सर्वांची नावेजनतेला माहिती आहेत. त्यामध्ये अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

न्याय योजना फायदेशीरराहुल गांधी यांनी सांगितले की, देशातील सर्वात गरिबांतील गरिब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना ही त्या लोकांमध्ये क्रयशक्ती निर्माण करेल.अशा योजनेमुळे तामिळनाडूमध्ये नवीन कारखाने उभारले जातील तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगनिर्मितीची आगारे असलेली तिरुपूर, कांचीपुरमसारखी ठिकाणे पुन्हा पहिल्यासारखीच बहरतील. त्यातून युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू