शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:14 IST

तमिळनाडूमध्ये परीक्षेपूर्वी आईचे निधन झाल्यानंतरही बारावीच्या विद्यार्थ्याने तिचे आशीर्वाद घेत परीक्षा दिली आहे.

तमिळनाडूमध्ये बारावीच्या एका विद्यार्थ्यासोबत हृदयद्रावक घटना घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडला आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी बारावीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतरही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून बारावीची परीक्षा दिली. परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्याने मृत आईचे दर्शन घेतलं. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर येथील सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याने अनोखा आदर्श घालून दिला आहे. अण्णा नगरमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती यांची पत्नी सुबललक्ष्मी यांचे सोमवारी निधन झाले. तर कृष्णमूर्ती यांचे ६ वर्षांपूर्वीचं निधन झालं होतं. कृष्णमूर्तींच्या जाण्यानंतर सुबललक्ष्मी यांनी त्यांच्या मुलांना  वाढवले. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सोमवारी सुबललक्ष्मी यांचे निधन झाले. सुबललक्ष्मी यांच्या निधनाने दोन्ही मुलांवरील आई वडिलांचे छत्र हरपलं आहे. मात्र अशातही सुनील कुमारने दुःखात तमिळ भाषेची परीक्षा दिली.

दुपारी सुनील कुमार घरी परतल्यानंतर सुबललक्ष्मी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. परीक्षेला जाण्यापूर्वी सुनील कुमारने आईला हात लावला आणि "आई, थोडा वेळ थांबा, मी परत येईन," असं म्हटलं होतं. हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. एकीकडे या घटनेने सुनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे त्याने एक नवा आदर्श ठेवला आहे.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुनीलने हॉल तिकीट आईच्या पायावर ठेवले आणि आशीर्वाद घेतले. पण तो रडला. त्याच्या नातेवाईकाने त्याला पकडून परीक्षा केंद्रावर नेले. सुनीलने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यापेक्षा तुझ्या आईला दुसरे काही नको असेल, असं त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितले.

दरम्यान, याआधी लातूरमध्येही असाच प्रकार घडला होता. वडिलांचे अंत्यविधी अर्ध्यावर सोडून दिशा नागनाथ उबाळे नावाची विद्यार्थिनी दहावीची मराठीची परीक्षा देण्यासाठी आली होती. दिशाचे वडील आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धाडस दाखवत, १६ वर्षीय दिशाने आपले अश्रू पुसले, वडिलांना अखेरचा निरोप दिला आणि मराठीचा पेपर देण्यासाठी औसा येथील अझीम हायस्कूलमधील परीक्षा केंद्राकडे निघाली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूHSC / 12th Exam12वी परीक्षा