शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 05:35 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तामिळ व तेलगू मते या वेळी कोणाला जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांच्या किमान ३२ मतदारसंघांत तेलगू भाषकांची मते निर्णायक ठरू शकतात.

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तामिळ व तेलगू मते या वेळी कोणाला जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांच्या किमान ३२ मतदारसंघांत तेलगू भाषकांची मते निर्णायक ठरू शकतात. आंध्र प्रदेशला स्वतंत्र दर्जा देण्यास मोदी सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळेच तेलगू देसमने सरकारमधून बाहेर पडण्याचा आणि पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तेलगू देसम सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेत आहे.तेलगू देसमचे नेतेही कर्नाटकात जाऊ न तेलगू भाषिक मतदारांनी भाजपाला मतदान करू नये, असा प्रचार करणार आहेत. तसे प्रत्यक्षात घडले, तर या ३२ मतदारसंघांत भाजपाची अडचण होईल. हे सारे मतदारसंघ आंध्र प्रदेश, तसेच तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर आहेत. तेलगू देसमचा त्या भागांतील मतदारांवर प्रभाव असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेलगू मतदारांनी कोणाला मतदान करावे, हे तेलगू देसमचे नेते सांगणार नाहीत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री के. ई. कृष्णमूर्ती मध्यंतरी बेंगळुरूला गेले होते. त्यांनी तिथे तेलगू भाषकांनी भाजपाला मतदान न करण्याचे उघडपणे आवाहनही केले. त्यामुळे ती मते आम्हाला मिळतील, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.दुसरीकडे कर्नाटकातील तेलगू भाषक कशा प्रकारे मतदान करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. तेलंगणात सत्तेवर असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समितीचा भाजपाला पाठिंबा नाही. पण त्यांनी काँग्रेसलाही पाठिंबा न देता, एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री चंद्रेशखर राव हे त्या पक्षासाठी कर्नाटकात सभाही घेणार आहेत. सपा व बसपा यांनीही जनता दल(धर्मनिरपेक्ष)शी आघाडी केली असली, तरी या दोन पक्षांना कर्नाटकात फारसे स्थान नाही. मात्र, मागासवर्गीय मते त्यांच्यामुळे मिळतील, असे देवेगौडा यांना वाटत आहे.कर्नाटकात तामिळ भाषकांची संख्या लक्षणीय आहे. बंगळुरू, शिमोगा, म्हैसुरू, रामनगरम, कोलार, हसन, मंड्या व चामराज नगर या जिल्ह्यांमध्ये तामिळ मते निर्णायक ठरू शकतात. कावेरी बोर्डाची स्थापना करण्यात मोदी सरकारने टाळाटाळ चालविली असल्याने तामिळ भाषिकही नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपाला मतदान करणार नाहीत, असा काँग्रेसचा दावा आहे.मात्र, कावेरी बोर्डाबाबतची कर्नाटक सरकारची भूमिकाही तामिळींना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस की भाजपा, असा पेच त्यांच्यापुढे असेल. सुमारे २0 ते २२ मतदारसंघांत तामिळींचे प्रमाण अधिक आहे. देवेगौडा यांचा पक्ष त्यामुळेच द्रमुकचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, कावेरी मुद्द्यावरून कर्नाटकातील कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे द्रमुकला अडचणीचे ठरेल. ही तामिळ व तेलगू मते मिळवण्यात नेमके कोणाला यश येते आणि लिंगायत मते कोणाकडे जातात, यावर राज्यातील सत्तेचे गणितठरणार आहे.राज्यात वोक्कालिगा समाज१५ टक्के, तर लिंगायत २0 टक्के आहे. लिंगायत समाज काँग्रेसकडे जाणार असतील, तर वोक्कालिगा मते आपल्याकडे यावीत, यासाठी भाजपाचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तेलगू व तामिळ ही मते खूपच महत्त्वाची ठरणार आहेत.काँग्रेसच्या २१८ जणांच्या यादीत ४२ लिंगायत उमेदवार असून, भाजपाचे ३१ लिंगायत उमेदवार आहेत. सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिल्यानंतर, लिंगायत मते मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांत चढाओढ लागली आहे.लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा निर्णय भाजपाला मान्य नाही. लिंगायत हे हिंदू धर्माचा भाग आहेत, अशीच भाजपाची भूमिका आहे. लिंगायत मते एकगठ्ठा काँग्रेसकडे जाऊ नयेत, यासाठी भाजपाने काही मतदारसंघांत जोर लावला आहे. ज्या भागांत लिंगायत मतदार अधिक आहेत, तिथेच भाजपाने ताकद लावल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस व भाजपाच्या लिंगायत उमेदवारांमध्येच या वेळी चुरस होणार आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Electionनिवडणूक