शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर बोलतच राहीन - व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:00 IST

माझ्याकडील नवीन जबाबदारीमुळे मला आता राजकारणावर बोलता येणार नाही आणि तसे बोलणे योग्यही नव्हे; परंतु लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी उपस्थित करू नयेत, असाही त्याचा अर्थ नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी व्यक्त केले.

हैदराबाद : माझ्याकडील नवीन जबाबदारीमुळे मला आता राजकारणावर बोलता येणार नाही आणि तसे बोलणे योग्यही नव्हे; परंतु लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी उपस्थित करू नयेत, असाही त्याचा अर्थ नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी व्यक्त केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.नायडू हे गुरुवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत उद्या, १0 आॅगस्ट रोजी संपत आहे.नायडू म्हणाले, यापूर्वी हे पद उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि झाकीर हुसेन यांनी भूषविले आहे. त्यांनी कशा पद्धतीने उपराष्ट्रपतिपदावर काम केले याचा मी अभ्यास करीत आहे. उपराष्ट्रपतिपदाची जबाबदारी असताना मी राजकारणावर बोलता कामा नये आणि तसे गृहीत धरूही नये आणि मीही अर्थातच बोलणार नाही. मात्र, लोकांच्या जिव्हाळ््याच्या आणि त्यांच्या भल्याच्या विषयांवर मी बोलू नये, असा त्याचा अर्थ असू शकत नाही. नवी जबाबदारी कशी पार पाडावी, यावर मी अधिकाºयांचाही सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यसभेचे सभापती या नात्याने मी सभागृहात विधायक चर्चा कशा होतील, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. विरोधी बाकांवरील सदस्यांसह सगळ््यांना बोलण्याची संधी मिळेल असा प्रयत्न मी करीन, असे ते म्हणाले. सरकारी विधेयके सुलभतेने संमत होण्यासाठी मी प्रयत्न करीन.विकासाचा अजेंडा हवासमाजातील विशिष्ट वर्गात असलेले दारिद्य, निरक्षरता, आर्थिक विषमता, भेदभाव आणि हेळसांडीचे वातावरण याचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, देशापुढील कार्यक्रम हा विकासाचा असला पाहिजे.हैदराबाद शहराशी असलेल्या चार दशकांच्या संबंधांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, आंध्रप्रदेशचे विभाजन झाले नव्हते, तेव्हा १९८०च्या प्रारंभी आंध्रप्रदेश विधानसभेच्या गं्रथालयात सदस्य या नात्याने मी कित्येक तास बसायचो. हैदराबादेत माझे पत्रकारांशी चांगले संबंध आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनातील यशात त्यांचा मोठा सहभाग आहे.