तलाठी, मंडल अधिकारी आजपासून संपावर
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
नाशिक : सातबारा संगणकीकरण आणि ई- फेरफार संदर्भात येणार्या अडी-अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने तलाठी आणि मंडल अधिकारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.२६) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तलाठी, मंडल अधिकारी आजपासून संपावर
नाशिक : सातबारा संगणकीकरण आणि ई- फेरफार संदर्भात येणार्या अडी-अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने तलाठी आणि मंडल अधिकारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.२६) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या वतीने सोमवारी (दि.२५) हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी सजांची व महसूल मंडलाची पुनर्रचना करण्यात यावी, तलाठी व मंडल अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळण्यात यावे. तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय बांधून देण्यात यावे. सदर सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गंत कर्मचार्यांसाठी राखून ठेवावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या आहेत. महसूल मंत्र्यांनी आश्वासन देऊनही एक वर्ष पूर्ण होऊन मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून याचा निषेध म्हणून संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ११ एप्रिलला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. १६ एप्रिलला जेवणाच्या सुटीत तहसील कार्यालयासमोर करण्यात आली. २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोेर आंदोलन करण्यात आले, परंतु शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)