शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

लष्कराशी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘एनओसी’ घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:18 IST

संरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराशी संबंधित विषयावर तयार केलेल्या कोणत्याही चित्रपटाच्या अथवा वेबसिरीजच्या जाहीर प्रदर्शनाआधी संबंधित निर्मात्यास आपल्याकडून ‘ना-हरकत दाखला’ (एनओसी) घेण्यास सांगावे, असे पत्र संरक्षण मंत्रालयाने चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डास पाठविले आहे.समाजात भारतीय सैन्याची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी मंत्रालयाने अशा ‘एनओसी’चा आग्रह धरला असल्याचे सूत्रांनी सागितले. ज्याद्वारे सैन्यदलांची प्रतिमा मलिन होईल अथवा त्यांच्या भावना दुखावतील, अशा कोणत्याही घटना अथवा दृश्ये चित्रपटांमध्ये न दाखविण्याच्या सूचना सेन्सॉरबोर्डाने सर्व संबंधितांना कराव्यात, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे.

संरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात अलीकडेच दाखल केल्या गेलेल्या एका जनहित याचिकेतही हाच मुद्दा उपस्थित केला गेला होता. एकता कपूर यांच्या ‘एक्सएक्सएक्स-एपिसोड-२’ या वेबसिरीजवर बंदी घालावी यासाठी लष्करातील एका सैनिकाच्या मेव्हण्याने ही याचिका केली आहे. या वेबसिरीजच्या एका भागात एका सैनिकाच्या पत्नीचे पात्र असून ती विवाहबाह्य संबंध ठेवून व्यभिचार करणारी दाखविली आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनाने, देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर प्राणांची बाजी लावत असताना वेगळा समज समाजात निर्माण होईल. याचिका म्हणते की, राज्यघटनेच्या अनुच्छेद ३३ अन्वये सैन्यदलांतील व्यक्तींचे संघटनस्वातंत्र्य हिरावून घेतले असल्याने त्यांना एवढे संरक्षण तरी द्यायलाच हवे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी त्यावर व्यापक राष्ट्रहितासाठी वाजवी निर्बंध जरूर घालायला हवेत.————————-काही कळीचे प्रश्न?च्संरक्षण मंत्रालयाच्या या पत्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, जसे-च्एखाद्या चित्रपटास जाहीर प्रदर्शनाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुन्हा असे ‘एनओसी’चे बंधन कसे घालता येऊ शकते?च्प्रदर्शनाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच ‘एनओसी’ घ्यायला सांगणे हा सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने संरक्षण मंत्रालय असे करू शकते का? चित्रपटांमध्ये फार पूर्वीपासून पोलीस दलाचे अकार्यक्षम असे चित्र दाखविले जात आले आहे. फक्त सैन्यदलांनाच अशी वेगळी वागणूक का? 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीIndian Armyभारतीय जवान