शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाबाबत दिसेल अशी ठोस कारवाई करा

By admin | Updated: April 27, 2016 04:53 IST

द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी द्विपक्षीय चर्चेदरम्यान अगदी स्पष्ट शब्दांत काही जटील मुद्दे उपस्थित केले. पाकिस्तानने काश्मीर हाच ‘मुख्य मुद्दा’ असल्याचे जाहीर केले.भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ ऐजाज अहमद चौधरी यांच्यातील बैठकीत पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबतचा खटला यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. चौधरी हे नवी दिल्लीत आयोजित ‘हार्ट आॅफ आशिया’ संमेलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. पठाणकोट हल्ल्यानंतर उभय विदेश सचिवांची ही पहिली भेट आहे. या भेटीदरम्यान भारताने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने केली. तथापि जाधव यांचे अपहरण केले नसून त्यांना अटक झाल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बलुचिस्तान व कराचीमधील विध्वंसक कारवायांमध्ये भारताची रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) सामील असल्याचा आरोप करून पाकने त्यावर चिंता व्यक्त केली. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला.‘काश्मीर हाच चर्चेचा मुख्य मुद्दा आहे आणि त्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मिरी जनतेच्या भावनानुरूप उचित तोडगा काढण्याची गरज आहे,’ असे आपल्या विदेश सचिवाने स्पष्ट केल्याची माहिती पाकिस्तानने दिली. याबाबत भारताच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया अथवा औपचारिक वक्तव्य देण्यात आले नाही.विदेश सचिव स्तरावरील या द्विपक्षीय चर्चेत पठाणकोट हल्ला आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीपूर्वी सांगितले. पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या जानेवारीत द्विपक्षीय चर्चा बंद करण्यात आली होती.‘विदेश सचिव अहमद यांनी आपल्या सर्व शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे. जम्मू-काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली,’ असे पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)