शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दहशतवादाबाबत दिसेल अशी ठोस कारवाई करा

By admin | Updated: April 27, 2016 04:53 IST

द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी द्विपक्षीय चर्चेदरम्यान अगदी स्पष्ट शब्दांत काही जटील मुद्दे उपस्थित केले. पाकिस्तानने काश्मीर हाच ‘मुख्य मुद्दा’ असल्याचे जाहीर केले.भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ ऐजाज अहमद चौधरी यांच्यातील बैठकीत पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबतचा खटला यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. चौधरी हे नवी दिल्लीत आयोजित ‘हार्ट आॅफ आशिया’ संमेलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. पठाणकोट हल्ल्यानंतर उभय विदेश सचिवांची ही पहिली भेट आहे. या भेटीदरम्यान भारताने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने केली. तथापि जाधव यांचे अपहरण केले नसून त्यांना अटक झाल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बलुचिस्तान व कराचीमधील विध्वंसक कारवायांमध्ये भारताची रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) सामील असल्याचा आरोप करून पाकने त्यावर चिंता व्यक्त केली. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला.‘काश्मीर हाच चर्चेचा मुख्य मुद्दा आहे आणि त्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मिरी जनतेच्या भावनानुरूप उचित तोडगा काढण्याची गरज आहे,’ असे आपल्या विदेश सचिवाने स्पष्ट केल्याची माहिती पाकिस्तानने दिली. याबाबत भारताच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया अथवा औपचारिक वक्तव्य देण्यात आले नाही.विदेश सचिव स्तरावरील या द्विपक्षीय चर्चेत पठाणकोट हल्ला आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीपूर्वी सांगितले. पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या जानेवारीत द्विपक्षीय चर्चा बंद करण्यात आली होती.‘विदेश सचिव अहमद यांनी आपल्या सर्व शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे. जम्मू-काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली,’ असे पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)