शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

दहशतवादाबाबत दिसेल अशी ठोस कारवाई करा

By admin | Updated: April 27, 2016 04:53 IST

द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या दहशतवादाच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका आणि दिसेल अशी ठोस कारवाई करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी द्विपक्षीय चर्चेदरम्यान अगदी स्पष्ट शब्दांत काही जटील मुद्दे उपस्थित केले. पाकिस्तानने काश्मीर हाच ‘मुख्य मुद्दा’ असल्याचे जाहीर केले.भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ ऐजाज अहमद चौधरी यांच्यातील बैठकीत पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबतचा खटला यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. चौधरी हे नवी दिल्लीत आयोजित ‘हार्ट आॅफ आशिया’ संमेलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. पठाणकोट हल्ल्यानंतर उभय विदेश सचिवांची ही पहिली भेट आहे. या भेटीदरम्यान भारताने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने केली. तथापि जाधव यांचे अपहरण केले नसून त्यांना अटक झाल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बलुचिस्तान व कराचीमधील विध्वंसक कारवायांमध्ये भारताची रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) सामील असल्याचा आरोप करून पाकने त्यावर चिंता व्यक्त केली. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला.‘काश्मीर हाच चर्चेचा मुख्य मुद्दा आहे आणि त्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मिरी जनतेच्या भावनानुरूप उचित तोडगा काढण्याची गरज आहे,’ असे आपल्या विदेश सचिवाने स्पष्ट केल्याची माहिती पाकिस्तानने दिली. याबाबत भारताच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया अथवा औपचारिक वक्तव्य देण्यात आले नाही.विदेश सचिव स्तरावरील या द्विपक्षीय चर्चेत पठाणकोट हल्ला आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीपूर्वी सांगितले. पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या जानेवारीत द्विपक्षीय चर्चा बंद करण्यात आली होती.‘विदेश सचिव अहमद यांनी आपल्या सर्व शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे. जम्मू-काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली,’ असे पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)