शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आता ताजमहल नाही...! भारत बघायला येणाऱ्यांची पहिली पसंती कशाला? अनूप जलोटांनी सांगितलं; तुम्हालाही आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:47 IST

"मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?"

पूर्वी भारत बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची पहिली पसंती ताजमहल होती. मात्र आता भारत भ्रमणासाठी येणारे लोक अयोध्येला येऊ इच्छित आहेत. दुसऱ्या स्थानावर काशी विश्वनाथ आणि तिसऱ्या स्थानावर ताजमहल आहे. हेच व्हायला हवे होते आणि हेच झाले, असे प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनी म्हटले आहे. अनूप जलोटा आज प्रभू रामचंद्रांची नगरी असलेल्या अयोध्येत आले होते. त्यांनी येथे रामललांचे दर्शन घेतले. 

जलोटा म्हणाले, माझ्यासोबत जगातील वेगवेगळ्या देशांतील 45 लोक आले आहेत. हे लोक रामललांचे दर्शन करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून फोन करत होते. राम ललांचे दर्शन घेण्यासाठी हे सर्वच जण उत्सूक आहेत. यात प्रामुख्याने दक्षीण आफ्रिका, इंग्लंड, थायलंड सह अनेक देशाचे लोक आहेत.

यावेळी, अयोध्या आणि देशाच्या विकासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राम-लक्ष्मणाची जोडी म्हणत, त्यांनी केलेल्या कामांचेही जलोटा यांनी कौतुक केले. ते म्हणाले, देशातील अर्धे लोक मोफत राशनचा लाभ घेत आहेत. चांगल्या व्यवस्था आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत मोदी सरकार नक्कीच 400 च्याही पुढे जाईल.

मुस्लीमही भाजपला मतदान करतील -यावेळी जलोटा यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा देशात चांगला विकास होईल, चांगल्या सुविधा निर्माण होतील, तेव्हा आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम बघायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?" 

टॅग्स :Anup Jalotaअनुप जलोटाAyodhyaअयोध्याTaj Mahalताजमहाल