शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना वाढण्यास ‘तबलिग’चा कार्यक्रमही कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 05:01 IST

केंद्र सरकार : राज्यसभेत केले निवेदन; बंदिस्त जागेत सामाजिक अंतराचा नियम पाळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथ सुरू झाल्यानंतर विविध यंत्रणांनी इशारे देऊनही दिल्ली येथे मार्च महिन्यात आयोजिलेल्या तबलिग जमातच्या मेळाव्यामुळेही कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना झाला, असे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.

यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले की, तबलिग जमातीने दिल्लीमध्ये बंदिस्त जागेत भरविलेल्या मेळाव्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नव्हते. तसेच अन्य कोणत्याच प्रकारची काळजी घेतली नव्हती. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग होण्यास हा कार्यक्रमही कारणीभूत ठरला.

तबलिग जमातने दिल्लीतील जामा मशिदीत मार्च महिन्यामध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील काही हजार जण उपस्थित होते. त्यांच्यामुळे परस्परांना व त्यांच्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग झाला.तबलिग जमातच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामुळे दिल्ली व अन्य राज्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला का, असा प्रश्न खासदार अनिल देसाई यांनी विचारला होता.

यासंदर्भात जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध तोडून तबलिघी जमातचा मेळावा आयोजित केल्याप्रकरणी मौलाना साद कंधलवी आणि सहा जणांवर पोलिसांनी ३१ मार्चला एफआयआर नोंदविला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह काही न्यायालयांनी तबलिघी जमातच्या सदस्यांविरोधात नोंदविलेले एफआयआर रद्द केले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग पसरविल्याच्या आरोपातून त्यांची मुक्तता केली आहे.२३३ जणांना आतापर्यंत अटक2,361 जण तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 233 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तबलिग जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्याविषयी तपास सुरू आहे. ९५६ विदेशी नागरिकांवर आतापर्यंत ५९ आरोपपत्रे दिल्ली पोलिसांनी दाखल केली आहेत. या कार्यक्रमाला ते सर्व हजर होते.केंद्राने या सर्वांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या