शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

टी. एन. शेषन नावाचे वादळ

By admin | Updated: September 28, 2014 01:26 IST

भारतातील निवडणुकांचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तपद भूषवलेल्या टी. एन. शेषन यांच्यावर एक मोठा अध्याय लिहिल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही.

धी भारतातील निवडणुकांचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तपद भूषवलेल्या टी. एन. शेषन यांच्यावर एक मोठा अध्याय लिहिल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. निवडणूक आचारसंहिता कठोरपणो राबवण्याच्या त्यांच्या आग्रहामुळेच आज निवडणूक प्रचारासह अन्य प्रक्रियेतील आमूलाग्र बदल पाहावयास मिळत आहेत. 
कोणत्याही उमेदवाराची, त्याच्या नातेवाइकांची हेटाळणी करू नका, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू नका, परवानगीशिवाय कुणाचीही जागा, इमारत, भिंत प्रचारासाठी वापरू नका; दुस:यांच्या प्रचारसभांमध्ये अडथळे आणू नका. योग्य परवान्याखेरीज मतदान केंद्रात प्रवेश करू नका, डाकबंगल्यातील सर्व खोल्या ताब्यात घेऊ नका, निवडणूक जाहीर झाल्यावर संपूर्ण कर्जमाफी करू नका. 
सरकारी विमानांचा गैरवापर करू नका. निवडणुकीची कामे आणि कचेरीतील कामे एकाचवेळी करू नका, तुमच्या सत्तारूढ पक्षाने काय काय कामे केली हे सांगण्याठी जनतेचा पैसा वापरून जाहिराती देऊ नका. अगदी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढय़ाच अनुदानांना मान्यता द्या. मंत्र्यांनी व इतरांनी आर्थिक अनुदानाच्या घोषणा करू नका, असे अनेक नियम आचारसंहितेत आहेत. प्रत्यक्षात मात्र या नियमांचे पालन होत नव्हते. शेषन यांनी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल, यावर भर दिला; कठोर निर्णय घेतले आणि आज एकूणच निवडणूक प्रचार पद्धतीत झालेला कमालीचा बदल पाहावयास मिळत आहे तो त्यामुळेच. त्याआधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणकोणते मार्ग खुलेआम वापरले जात हे सर्वश्रुत आहे. निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत ते इतके आग्रही असत की शेषन यांनीच आचारसंहिता तयार केली की काय, असा अनेकांचा गैरसमज झाला होता. मात्र ती आपण तयार केली नसून, केवळ त्यावर सही करण्याचे काम केल्याचे ते सांगत. आपली निवडणूक प्रक्रिया कमालीची दोषपूर्ण आणि एक विनोद असल्याचे त्यांचे मत होते. तुम्हाला या देशात कायदेशीर निवडणुका व्हायला हव्या असतील, तर कृपा करा आणि निवडणूक आयोगाला स्वायत्तता द्या, असे त्यांनी सरकारला सुनावले होते. अनेक नेत्यांशी त्यांचे वेगवेगळ्य़ा कारणांवरून मतभेद आणि वादही झाले होते. निवडणुकांना हानी पोचवणारे दीडशे मार्ग शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला होता. एकूणच शेषन हे निवृत्त होऊन 18 वर्षे झाली तरी निवडणूक म्हटले की त्यांचे नाव आठवतेच. निवडणूक प्रक्रियेवर त्यांच्या कामगिरीचा कितपत परिणाम झाला, हे तर आपण पाहतोच आहोत.
 
कायम चर्चेत राहिलेली व्यक्ती
शेषन हे वेगवेगळ्य़ा कारणांनी कायमच चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले व्यक्तिमत्त्व. 1991 ते 1996 या कालावधीत ते निवडणूक आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1991 साली सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करून एकूण सहा भागांची आदर्श आचारसंहिता तयार केली होती. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना निवडणूक पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांचा एक तपशीलवार अहवाल तयार करून आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते. 10 फेब्रुवारी 1992 रोजी शेषन यांनी तो अहवाल सरकारकडे पाठवून दिला. मात्र मे 1994 र्पयत त्यांना त्याची पोहोचही मिळाली नव्हती  !
 
- रवींद्र राऊळ