शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 07:16 IST

मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

जबलपूर : जगावरील तिसऱ्या महायुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. या स्थितीत जागतिक शांतीसाठी संपूर्ण जगाची आशा आता भारतावर असल्याचे सांगून यात काही लोक अडथळे निर्माण करीत असल्याचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी नमूद केले. भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

सध्या युक्रेन-रशिया युद्ध असो अथवा इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष असो, यातून तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे महायुद्ध नेमके कुठून सुरू होईल हे इतक्यात स्पष्ट नसले तरी सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या क्षेत्रातूनच याची ठिणगी पडू शकते, असे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालक भागवत यांनी विज्ञानात जगाने साधलेली प्रगती आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावरही भाष्य केले. 

मानवतेची सेवा हाच सनातन धर्ममानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म असून हेच हिंदुत्वातही असते. याच हिंदुत्वात जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य असल्याचे भागवत म्हणाले. भारतीय ग्रंथांत लिखीत स्वरुपात मांडला जाण्याआधीच हिंदू शब्द अस्तित्वात आला होता. जनतेत जाहीरपणे या शब्दाचा वापर श्री गुरुनानक देवजींनी केला होता, असेही ते म्हणाले.

विज्ञानाच्या लाभापासून अजूनही गरीब वर्ग वंचित

विज्ञानाच्या क्षेत्रात जगाने खूप प्रगती केली; परंतु त्याचे लाभ अजूनही जगातील गरिबांपर्यंत पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे जगाचा विनाश करणारी शस्त्रास्त्रे मात्र जागोजाग पोहोचत आहेत. 

ग्रामीण भागात काही आजारांवरील औषधे भलेही मिळत नसतील, परंतु देशी कट्टा मात्र येथे सहज पोहचतो. एकीकडे ही स्थिती असताना पर्यावरणाकडील दुर्लक्षाकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत