शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 07:16 IST

मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

जबलपूर : जगावरील तिसऱ्या महायुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. या स्थितीत जागतिक शांतीसाठी संपूर्ण जगाची आशा आता भारतावर असल्याचे सांगून यात काही लोक अडथळे निर्माण करीत असल्याचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी नमूद केले. भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

सध्या युक्रेन-रशिया युद्ध असो अथवा इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष असो, यातून तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे महायुद्ध नेमके कुठून सुरू होईल हे इतक्यात स्पष्ट नसले तरी सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या क्षेत्रातूनच याची ठिणगी पडू शकते, असे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालक भागवत यांनी विज्ञानात जगाने साधलेली प्रगती आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावरही भाष्य केले. 

मानवतेची सेवा हाच सनातन धर्ममानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म असून हेच हिंदुत्वातही असते. याच हिंदुत्वात जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य असल्याचे भागवत म्हणाले. भारतीय ग्रंथांत लिखीत स्वरुपात मांडला जाण्याआधीच हिंदू शब्द अस्तित्वात आला होता. जनतेत जाहीरपणे या शब्दाचा वापर श्री गुरुनानक देवजींनी केला होता, असेही ते म्हणाले.

विज्ञानाच्या लाभापासून अजूनही गरीब वर्ग वंचित

विज्ञानाच्या क्षेत्रात जगाने खूप प्रगती केली; परंतु त्याचे लाभ अजूनही जगातील गरिबांपर्यंत पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे जगाचा विनाश करणारी शस्त्रास्त्रे मात्र जागोजाग पोहोचत आहेत. 

ग्रामीण भागात काही आजारांवरील औषधे भलेही मिळत नसतील, परंतु देशी कट्टा मात्र येथे सहज पोहचतो. एकीकडे ही स्थिती असताना पर्यावरणाकडील दुर्लक्षाकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत