शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

मिठाई नाकारली, सीमेवर गोळीबार

By admin | Updated: July 19, 2015 02:40 IST

सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात

अमृतसर/जम्मू : सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात आलेली मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलातर्फे जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये अटारी वाघा सीमेवर सणउत्सवाला एकमेकांना मिठाई वाटण्याची परंपरा आहे. अमृतसरमध्ये बीएसएफचे उपमहासंचालक एम.एफ. फारुकी यांनी सांगितले की, वाघा सीमेवर आम्ही मिठाई दिली; परंतु दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही दरवेळी ईदला मिठाई देतो. आज पाकी सैनिकांनी मिठाई घेतली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र बीएसएफने आपल्या समकक्षांना मिठाई दिली नाही. दलाच्या वरिष्ठ कमांडरने दिल्लीतील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाककडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध नोंदविण्यासाठी मिठाईचे वाटप करण्यात आले नाही. (वृत्तसंस्था)चोराच्या उलट्या बोंबानवी दिल्ली- पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत व आमचे त्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतात. दोन्ही बाजूंची इच्छा असेल तर द्विपक्षीय संबंधात मिठाचा खडा ठरणाऱ्या समस्या सहज सुटू शकतात,असे प्रतिपादन भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी शनिवारी केले.ईदेच्या पर्वावर बासित यांनी येथील फतेहपुरी मशिदीच्या इमामांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उभय देशांमधील संबंधात सुधारणा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. दोन्ही देशांची इच्छाशक्ती असल्यास गरिबी, निरक्षरता आणि आरोग्यविषयक समान मुद्यांवर नक्कीच तोडगा काढता येईल. पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, अग्निबाणांचा माराजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी छोट्या अग्निबाणांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मागील १२ तासातील शस्त्रसंधी उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे.पाकिस्तानी सैन्याने पुंछ सेक्टरमध्ये शाहपूर केरनी भागात लष्कराच्या अनेक चौक्यांवर कुठल्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेला हा गोळीबार अद्याप थांबलेला नसून भारतीय जवानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. शुक्रवारी रात्री उशिरा सुद्धा पाकी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कुठलीही जीवहानी झाल्याचे वृत्त नाही. या महिन्यात सीमेपलिकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या १५ जुलैला पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्णात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एक महिला ठार तर सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सहा जण जखमी झाले होते. तत्पृूर्वी ९ जुलैला उत्तर काश्मीरच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.पुन्हा पाकिस्तान, इसिसचे झेंडे फडकलेश्रीनगर : ईदेच्या नमाजानंतर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्णासह आणखी काही भागात दगडफेक करणारे युवक आणि सुरक्षा दलादरम्यान चकमकी उडाल्या. याशिवाय शहरातील जुन्या बरजुल्ला परिसरात पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे (इसिस) झेंडे फडकविण्यात आले. दगडफेकीच्या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी सुद्धा काही फुटीरवाद्यांनी पाकिस्तान, लष्कर-ए-तय्यबा आणि इसिसचे झेंडे फडकविल्यानंतर काही युवक आणि सुरक्षा जवानांमध्ये बाचाबाची झाली होती.