शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

"पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:18 IST

दिल्लीत आपविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या पक्षाविरुद्ध मोर्चा उघडला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्रीपद सोडणाऱ्या आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरही स्वाती मालीवाल यांनी निशाणा साधला आहे.

स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करून आतिशी यांना फटकारले आहे. या व्हिडिओमध्ये, आतिशी आपल्या समर्थकांसोबत विजयाचा आनंद साजरा करताना नाचत असल्याचे दिसून येत आहे. यावरून स्वाती मालीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "जेव्हा संपूर्ण पक्ष हरला, मोठे नेते निवडणुकीत हरले, मग आतिशी कशाचा आनंद साजरा करत आहेत?, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत आपविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, "मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही तर जनतेच्या संतापाचा आवाज उठवला. लोक खूप संतापले होते. दिल्लीची स्थिती बिकट झाली आहे, शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे. अरविंद केजरीवाल आणि आतिशी एसी रूममध्ये पत्रकार परिषदा घेतात, तर मी जमिनीवर काम करते."

आपच्या पराभवाने तुम्ही खूश आहात का? असे विचारले असता स्वाती मालीवाल भावूक झाल्या आणि म्हणाल्या,"मला खोटारडी म्हटले गेले, माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला. एका महिलेवर हिंसाचार झाला आणि देवाने त्यांना त्याची शिक्षा दिली आहे." याचबरोबर, स्वाती मालीवाल यांनी आप पक्ष सोडण्याबाबत स्पष्ट नकार दर्शविला. त्या म्हणाल्या की,"मी आपला १२ वर्षे दिली आहेत. आप पक्ष म्हणजे केवळ अरविंद केजरीवाल यांची संपत्ती नाही." 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, राखी बिर्लन आणि सोमनाथ भारती यांसारख्या आपच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला. 

दिल्लीत २७ वर्षानंतर भाजपची सत्तादिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० मतदारसंघात ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं आणि ८ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. यात जनतेने ४८ जागांवर भाजपला कौल दिला असून तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली आहे. तर, गेल्या निवडणुकीत ६२ जागा जिंकणाऱ्या आपला या निवडणुकीत फक्त २२ जागांवर समाधान मानावं लागलं.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली