शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Swami Agnivesh Death News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 20:26 IST

Swami Agnivesh Death News : सामाजिक मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडणाऱ्या स्वामी अग्निवेश यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाची राजकीय पार्टी स्थापन केली होती.

ठळक मुद्देस्वामी अग्निवेश यांनी २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता.

नवी दिल्ली :  आर्य समाजाचे नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस (आयएलबीएस) मध्ये दाखल करण्यात आले होते.

स्वामी अग्निवेश यांच्या निधनाची बातमी आयएलबीएसकडून देण्यात आली. यावेळी स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु हे शक्य झाले नाही. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे आयएलबीएसकडून सांगण्यात आले.

स्वामी अग्निवेश यांना यकृतासंबंधी त्रास होत होता. गेल्या मंगळवारपासून त्यांच्या शरिरातील प्रमुख अवयवांनी कार्य करणे बंद केल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होती. परंतु अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

सामाजिक मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडणाऱ्या स्वामी अग्निवेश यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाची राजकीय पार्टी स्थापन केली होती. १९७७ मध्ये ते हरयाणा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण आले होते आणि त्यावेळी हरयाणा सरकारमध्ये  शिक्षण मंत्री सुद्धा होते. त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ति मोर्चा नावाची संघटना स्थापन केली. 

स्वामी अग्निवेश यांनी २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर सरकारमध्ये बदल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली होती. सामाजिक हितासाठी त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. याशिवाय, बिग बॉस या रियालिटी शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.

आणखी बातम्या...

- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता    

- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट    

- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण    

- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल     

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती   

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली