शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

‘गिळलेले’ काश्मीर आधी सोडा!

By admin | Updated: October 2, 2015 04:19 IST

काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली.

संयुक्त राष्ट्रे : काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली. त्याचबरोबर पीओकेचा (पाकव्याप्त काश्मीर) अवैध ताबा पाकने लवकर सोडावा, असेही सुनावले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर थोड्याच वेळात दिल्लीहून भारताची तीव्र प्रतिक्रिया आली. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीर मुद्दा न सुटण्यास संयुक्त राष्ट्राचे अपयश संबोधले. त्याचबरोबर भारतासोबत शांततेसाठी ‘शांतता पुढाकार’ या चतु:सूत्रीचा प्रस्ताव ठेवला. या चतु:सूत्रीत काश्मीर सैन्यमुक्त करण्याच्या मागणीचा समावेश आहे. काश्मीर सैन्यमुक्त करणे हे उत्तर नाहीतर पाकिस्तान दहशतवादमुक्त करणे हे खरे उत्तर आहे. पाक हा दहशतवादाचा नाहीतर तो स्वत:च्या धोरणाचा मुख्य पीडित आहे, असे धारदार प्रत्युत्तर भारताचे परराष्ट्र सचिव विकास स्वरुप यांनी दिले. टष्ट्वीटमालिकेतून त्यांनी शरीफ यांच्या भाषणाची प्रचंड चिरफाड केली. पाक दहशतवादाचा मुख्य पीडित असल्याच्या शरीफ यांच्या वक्तव्याचा दुसऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याने समाचार घेतला. पाकच दहशतवादाचा मुख्य पोशिंदा असून तो सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून त्याचा वापर करतो, असे हा अधिकारी म्हणाला.संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी अभिषेक सिंह यांनी आमसभेदरम्यान उत्तर देण्याच्या भारताच्या अधिकाराचा वापर करताना म्हटले की, वस्तुस्थिती ही आहे की, तो (पाकिस्तान) दहशतवादाचे पालनपोषण करण्याच्या स्वत:च्या धोरणाचा बळी ठरला आहे. दहशतवादाचा उपयोग सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून वापर करणारा देश याच्या केंद्रस्थानी आहे.याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटच्या मालिकेतून प्रत्युत्तर देताना म्हटले की, काश्मिरातून सैन्य काढून घेतल्यानंतर नाही तर पाकने दहशतवादाला मूठमाती दिल्याने तोडगा निघेल. त्यांनी टिष्ट्वटरवर असेही लिहिले, दहशतवाद्यांचे पालनपोषण केल्यामुळे पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली असून, स्वत: निर्माण केलेल्या भस्मासुराचे शेजाऱ्यांवर खापर फोडणे हे समस्येवरील उत्तर नाही.(वृत्तसंस्था)‘पॅलेस्टिनी आणि काश्मिरी लोक परदेशींच्या ताब्याने पीडित असल्याच्या शरीफ यांच्या या टिपणीवर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वरूप म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधानांचे परदेशी ताब्याचे वक्तव्य अगदी बरोबर आहे; परंतु ताबा करणाऱ्यांची नावे त्यांनी चुकीची सांगितली. पाकने पाकव्याप्त काश्मीर लवकरात लवकर रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. शरीफ यांनी जगभरातील मुस्लीम पीडित असल्याचे मत मांडताना काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली होती. पॅलेस्टीनी आणि काश्मिरी परदेशी ताब्याने पीडित असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर जोरदार हल्ला चढविताना अभिषेक सिंग यांनी अवैध ताबा करणारा पाकिस्तान असल्याचे सांगून भारत प्रलंबित मुद्द्यांवर पाकशी दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.