शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सुषमा स्वराज संसदेत खोट बोलल्या - चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:58 IST

भारत-चीनमध्ये सुरु असलेला संघर्ष चिघळत चालला असून, ग्लोबल टाइम्सच्या लेखातून भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी देण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बीजिंग, दि. 21 - सिक्कीम जवळच्या डोकलाममध्ये भारत-चीनमध्ये सुरु असलेला संघर्ष चिघळत चालला असून, ग्लोबल टाइम्सच्या लेखातून भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी देण्यात आली आहे तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांनी चुकीची माहिती दिली असून त्या देशाच्या संसदेत खोट बोलल्या असे या लेखात म्हटले आहे. 
 
सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सिक्कीममधल्या परिस्थिती संदर्भात संसदेत माहिती दिली. चीनकडून युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपले संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत गुरुवारी स्पष्ट केले. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 
 
भारत-चीन संघर्षात अनेक देश भारताला पाठिंबा देत असल्याचे त्या म्हणाल्या. पण प्रत्यक्षात भारताला एकाही देशाचा पाठिंबा नाही. भारताच्या डोकलाममधील भूमिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाला धक्का बसला आहे. भारताने चीनच्या प्रदेशात घुसखोरी केलीय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
 
लष्करी सामर्थ्यात चीन भारताच्या बराच पुढे आहे. उद्या संघर्षाची वेळ आलीच तर, भारताचा पराभव अटळ आहे असे या लेखात म्हटले आहे. डोकलाममध्ये दीर्घकाळ ठाण मांडण्याचा विचार भारताने सोडून द्यावा. चीन आपले सैन्य अजिबात मागे घेणार नाही. डोकलाम हा चीनचा भाग आहे असे लेखात म्हटले आहे. भारताने सैन्य मागे घ्यावी ही चर्चेची पूर्व अट आहे. चीन त्यावर अजिबात तडजोड करणार नाही असे लेखात म्हटले आहे. 
 
चिनी सैन्य तैनात नाही...
लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. तिबेटमध्ये चिनी लष्कर कोणताही युद्ध सराव करीत नसल्याचेही भारतीय सूत्रांनी म्हटले आहे.
तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारतीय सैन्याने डोकलाममधून माघार घ्यावी अशी चीनची मागणी आहे. पण त्याचवेळी चीननेही तिथून माघार घ्यायला हवी, अशी आपली भूमिका आहे, असे स्वराज म्हणाल्या.
 
चीनच्या वन बेल्ट
वन रोड प्रकल्पासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भारताने सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला आहे.